पाणी भरण्यावरुन शेजारणींमध्ये वाद झाला, वाद इतका विकोपाला गेला की शेजाऱ्याने थेट…

पाणी भरण्यावरुन दोन शेजारणींमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि दोन्ही कुटुंबेही भांडणात सहभागी झाली. काही वेळाने भांडण मिटले, मात्र भांडणाचा राग मनातून गेला नव्हता.

पाणी भरण्यावरुन शेजारणींमध्ये वाद झाला, वाद इतका विकोपाला गेला की शेजाऱ्याने थेट...
पाण्यावरुन झालेल्या भांडणातून शेजाऱ्याने शेजाऱ्याला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 3:57 PM

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एकच खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पाणी भरण्यावरुन झालेल्या वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. फारुख शेख आणि आसिफ शेख अशी हल्ला करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात धारावी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांना दोघा आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद वाजिद शेख आणि मोहम्मद साजिद शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.

पाणी भरण्यावरुन शेजारणींमध्ये वाद झाला होता

धारावीमध्ये दररोज संध्याकाळच्या सुमारास पाणी येते. यावेळी पाणी भरण्यावरुन दोन शेजारणींमध्ये शनिवारी भांडण झाले. गव्हर्नर चाळच्या प्लॉट क्रमांक 21 मध्ये शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास नसरीन बानो आणि तिची शेजारीण राबिया शेख भांडण झाले. भांडण इतके वाढले की, दोन्ही महिलांचे कुटुंबीयही भांडणात सामील झाले. यानंतर काही वेळाने भांडण मिटले.

भांडणानंतर बदल्याच्या हेतून शेजाऱ्यावर हल्ला

भांडण जरी मिटले असले तरी मनातील राग मात्र शांत झाला नव्हता. याच भांडणातून एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाचा काटा काढण्याचा कट रचला. एका कुटुंबातील मोहम्मद वाजिद शेख आणि मोहम्मद साजिद शेख यांनी दुसऱ्या कुटुंबातील फारुख शेख आणि त्याचा चुलत भाऊ आसिफ शेख यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा कट रचला. त्यानुसार साजिदने फारुखच्या पोटात वार केला, तर वाजिदने आसिफच्या छातीत जीवघेणा वार केला. दोघांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.