कल्याणमध्ये चोरांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत बारसह 4 दुकानं, घरही लुटलं; लाखोंचा माल लंपास

कल्याण शहरात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरात चोरांचा सुळसुळाट पसरला असून त्याचा फटका सामान्य नागरिक, दुकानदारांनाही बसत असल्याचे चित्र दिसत आहे.

कल्याणमध्ये चोरांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत बारसह 4 दुकानं, घरही लुटलं; लाखोंचा माल लंपास
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 8:30 AM

कल्याण शहरात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरात चोरांचा सुळसुळाट पसरला असून त्याचा फटका सामान्य नागरिक, दुकानदारांनाही बसत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये चोरांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री एका बारसह चार दुकानं लुटली. तसेच एक घरात घुसून चोरी करत लाखो रुपयांचा माल लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळसेवाडी पोलिसांना चोरांचे खुले आवाहन आहे. पोलिसानी याप्रकरणी तपास सुरू केला असून चोरांचा शोध घेतला जात आहे.

दुकानांची शटर्स तोडली अन्…

कल्याण पूर्वेतील गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता कोळसेवाडी पोलिस ठाणे हद्दीतील गणेशवाडी, मच्छिमार्केटच्या वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावर चोरट्यांनी एका बारसह अनेक दुकानांची शटर्स तोडून मुद्देमाल आणि रोख रक्कम लंपास केली. बुधवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी मध्यरात्री सर्व शहर झोपेत असताना २ ते ३ च्या सुमारास गणेश वाडीतील अमृत पॅलेस बार,अन्नपूर्णा मालवणी स्टोअर्स, पानेरी हे कपड्यांचे दुकान, केअर अँड कॅअर, मेडीकल स्टोअर्स, या दुकानांमध्ये चोरटे शिरून त्यांनी चोरी केली. तसेच देवी दयाल टॉवर जवळील एक निवासी घरात घुसूनही चोरट्यांनी घरातील सामान, दागिने लुटले. ही घरफोडी करत चोरांनी एक लाख रुपयांहून अधिक किमतीची रोकड व मौल्यवान वस्तू लंपास केल्या. धक्कादायक गोष्ट म्हणडे चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र अश्या प्रकारे भरवस्तीत, नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी खुलेआम चोरी होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरांनी एकाप्रकारे पोलिसांना खुले आव्हान दिले असून परिसरातील रहिवासी व व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.