समीन वानखेडेंना यांना अटकेपासून दिलासा कायम, पुढील सुनावणी 23 जूनला होणार

सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी समीन वानखेडेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होती. यावेळी समीर वानखेडेंसह, सीबीआय पथक, एनसीबी पथक आणि एनसीबी डीडीजी उपस्थित होते.

समीन वानखेडेंना यांना अटकेपासून दिलासा कायम, पुढील सुनावणी 23 जूनला होणार
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 3:13 PM

मुंबई : एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून पुन्हा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांनी सीबीआयनं नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. तपास प्राथमिक अवस्थेत असल्यानं वानखेडेंना दिलेला अटकेपासूनचा दिलासा रद्द करण्याची सीबीआयने मागणी केली आहे. मात्र समीर वानखेडे यांना दोन आठवडे संरक्षण कायम ठेवत, याचिकेवर पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. पुढील सुनावणी 23 जूनला होणार आहे. यावेळी सुनावणीला समीर वानखेडे यांच्यासह सीबीआयची टीम आणि NCB चे डीडीजी ज्ञानेश्वर सिंगही उपस्थित होते.

एनसीबीची एक टीमही कोर्टात हजर होती. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या वडिलांचा आणि बहिणीचा जबाब सीबीआयने नोंदवला आहे. ज्ञानदेव वानखेडे आणि जास्मीन वानखेडे यांचा जबाब सीबीआयने नोंदवला आहे. समीर वानखेडे यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी ही माहिती दिली.

याआधी 8 जूनपर्यंत दिलासा दिला होता

याआधी मुंबई उच्च न्यायालयात 22 मे रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा कायम ठेवला होता. 8 जूनपर्यंत वानखेडे यांना अटक न करण्याचे निर्देश सीबीआयला कोर्टाने दिले होते. या प्रकरणात 3 जून रोजी सीबीआयला आपला अहवाल कोर्टात सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर 8 जूनला या प्रकरणात पुढील सुनावणी होणार होती. मात्र आज झालेल्या सुनावणीतही कोर्टाने वानखेडे यांना दिलासा कायम ठेवला आहे. यानंतर पुढील सुनावणी 23 जून रोजी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.