Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंडके छाटलेल्या मृतदेहाची ओळख पटली, अनैतिक संबंधातून हत्या, गंगापूर पोलिसांकडून क्लिष्ट खुनाचा उलगडा

औरंगाबाद नगर महामार्गावरील पुलाखाली एका मुंडके छाटलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळला होता.

मुंडके छाटलेल्या मृतदेहाची ओळख पटली, अनैतिक संबंधातून हत्या, गंगापूर पोलिसांकडून क्लिष्ट खुनाचा उलगडा
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 9:15 AM

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर पोलिसांनी एका अत्यंत क्लिष्ट खुनाचा उलगडा केला आहे. (Aurangabad Complicated Murder Case) औरंगाबाद नगर महामार्गावरील पुलाखाली एका मुंडके छाटलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा कुठलाच सुगावा लागत नव्हता. तेव्हा पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्याचा छडा लावत उलगडा केला (Aurangabad Complicated Murder Case).

मुंडके छाटलेल्या मृतदेगहाची ओळख पटवणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र तरीदेखील पोलिसांनी तपास करत अखेरीस आरोपीला मोठ्या शिताफीने जेरबंद केले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर परिसरात ढोरेगाव पुलाखाली दोन महिन्यापूर्वी सापडलेल्या मुंडके नसलेल्या प्रेताची ओळख पटली असून सदर खून महिलेचे इतरांशी असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

अश्विनी गोरख गरगडे (वय 32 राहणार वडगाव कोल्हाटी वाळूज) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून मृताच्या नंदाईने (नंदेचा पती) खुनाची सुपारी देऊन हा खून केला असल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे (Aurangabad Complicated Murder Case).

नेमकं प्रकरण काय?

औरंगाबाद पुणे महामार्गावरील ढोरेगाव जवळील पुलाखाली 20 ऑगस्ट रोजी मुंडके नसलेल्या स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात आरोपीने खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत पुलावरुन पाण्यात फेकून दिला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रेताचा पंचनामा करत ते उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते.

मुंडके नसलेल्या मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी मृत महिलेच्या अंगावरील कपडे, पायातील पैंजण यांच्या आधारे शिताफीने तपास केला आणि हा मृतदेह अश्विनी गोरख गरगडे या महिलेचा असल्याचं तपासात समोर आलं.

मृत महिलेचा नंदाई दत्तू सयाजी पंडितने हा खून सुपारी देऊन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अनैतिक संबंधातून महिलेचा खून झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दत्तू पंडितसह चार जणांना अटक केली आहे.

या खुनाचा उलगडा केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना पोलीस अधीक्षकांनी 15 हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.

Aurangabad Complicated Murder Case

संबंधित बातम्या :

अंत्यसंस्कारावेळी गळ्यावरील व्रण उघड, सासूच्या हत्येचा थरारक उलगडा

अमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक, नालासोपाऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 10 जण ताब्यात

देशी दारुची तस्करी जोमात, भंडारा जिल्ह्यात 8 लाखांची दारु जप्त, सहा जणांना बेड्या

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.