Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AICTE | गणित, भौतिकशास्त्रच्या शिक्षणाशिवाय इंजिनिअरिंगचं शिक्षण अपूर्ण : अनिल सहस्त्रबुद्धे

अनिल सहस्त्रबुद्धे यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र विषय महत्वाचे असल्याचं म्हटलं आहे.

AICTE | गणित, भौतिकशास्त्रच्या शिक्षणाशिवाय इंजिनिअरिंगचं शिक्षण अपूर्ण : अनिल सहस्त्रबुद्धे
अनिल सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष, अेआयसीटीई
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 4:23 PM

मुंबई: अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे तीन विषय अनिवार्य नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE )अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र विषय महत्वाचे असल्याचं म्हटलं आहे. या तीन विषयांशिवाय कुणीच अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करु शकत नाही, असं त्यांनी सांगतिलं. कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान आणि जीव तंत्रज्ञानशाखांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल केल्याची माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली. (AICTE president Anil Sahasrabudhe said Maths chemistry and Physics are important for engineering course)

अनिल सहस्त्रबुद्धे काय म्हणाले?

अनिल सहस्त्रबुद्धे यांनी आम्ही कधीच अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र नको असं म्हटल नाही. हे विषय महत्वाचे आहेत. या तीन विषयांशिवाय कुणीच अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करु शकत नाही, असं त्यांनी सांगतिलं.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा विकास

अनिल सहस्त्रबुद्धे यांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांविषयी जागरुकता निर्माण करण्याची गरज होती. इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाविषयी स्थिती स्पष्ट करणं गरजेचे होते. त्यामुळे टेक्नोलॉजीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियमांमध्ये बदल करणं गरजेचे आहे.

शिक्षण क्षेत्रातून निर्णयाला विरोध

वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून AICTE ने हा निर्णय घेतला असला तरी याला शिक्षण क्षेत्रातून विरोध होताना दिसत आहे. गणित हा विषय अभियांत्रिकीच्या सर्व विषयांचा पाया आहे. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी गणिताचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केल होते.

नवे 14 विषय कोणते?

2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत. यंदाच्या वर्षापासून अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता (entrepreneurship) या विषयांचा अंतर्भाव असेल.

संबंधित बातम्या:

चिंता मिटली! बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार

(AICTE president Anil Sahasrabudhe said Maths chemistry and Physics are important for engineering course)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.