Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीच्या परीक्षा होणार की नाही, केंद्र सरकार मोठा निर्णय जाहीर करणार?

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री मोठा निर्णय जाहीर करु शकतात.

बारावीच्या परीक्षा होणार की नाही, केंद्र सरकार मोठा निर्णय जाहीर करणार?
सीबीएसई दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, येथे जाणून घ्या नवीन अपडेट
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 10:32 AM

नवी दिल्ली: सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. केंद्र सरकारच्यावतीनं अटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला. केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करेल, असं त्यांनी कोर्टात सांगितले. दुसरीकडे 14 एप्रिलला दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीच्या लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत 1 जूनला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करु, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं होतं. त्यामुळे केंद्र सरकार बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. (CBSE Class 12th exam Central Education Minister Ramesh Pokhariyal may announce decision on class 12 exam )

केंद्रीय शिक्षणमंत्री परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 23 मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी 25 मेपर्यंत राज्य सरकारांनी त्यांचं मत कळवावं, असं म्हटलं होतं. राज्यांनी नोंदवलेली मतं आणि देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन रमेश पोखरियाल निशंक हे आज बारावी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करु शकतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन परीक्षांचं आयोजन करणं व्यवहार्य नाही. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची भूमिका विद्यार्थ्यांकडून मांडण्यात येत आहे.

सुनावणी पुढे का ढकलली?

सुप्रीम कोर्टात अ‌ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेईल असं सांगितल.यावर सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षीचं धोरण का बदलण्यात आलं याविषयी समपर्क कारणं द्यावीत, असं देखील सांगितलं. केंद्र सरकार दोन दिवसांत परीक्षांबाबत निर्णय घेईल, त्यासाठी सुप्रीम कोर्टानं आम्हाला गुरुवारपर्यंत वेळ द्यावा, अशी विनंती के के वेणूगोपाल यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयानं ही विनंती मान्य करत सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित केली.

300 विद्यार्थ्यांचं सरन्यायाधीशांना पत्र

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची 12 परीक्षा रद्द करणे किंवा ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमना (CJI NV Ramana) यांना 300 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं होतं. विद्यार्थ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आणि म्युकर मायकोसिसचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश यांनी लक्ष घालावं, असं देखील म्हटलं होतं.

सीबीएसई जुलै महिन्यात परीक्षा घेणार?

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान दोन टप्प्यात बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. सीबीएसई 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान परीक्षांचं आयोजन करु शकते. नियमित पॅटर्न प्रमाणं परीक्षा न घेता मुख्य विषयांच्या परीक्षा घेण्याचा पर्याय देखील सीबीएसई समोर उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या:

CBSE, ICSE Class 12 Exams: बारावीच्या परीक्षा रद्द होणार का? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

(CBSE Class 12th exam Central Education Minister Ramesh Pokhariyal may announce decision on class 12 exam )

रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.