ब्रह्मदेव आला तरी आम्हाला मंत्रिपद मिळणार नाही, दिलं तर… बच्चू कडू यांंचा मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार हल्ला

मंत्रिमंडळ विस्तारावरून बोलताना आमदार बच्चू कडू यांनी जोरदार हल्ला केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मला तर देणार नाही आणि दिलं तरी मी घेणार नाही, जर आलच तर त्यांनी पक्षातील आमदाराला देणार असल्याचं सांगितलं आहे.

ब्रह्मदेव आला तरी आम्हाला मंत्रिपद मिळणार नाही, दिलं तर... बच्चू कडू यांंचा मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार हल्ला
bacchu kaduImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 8:49 PM

आम्हाला राजकारण करावे लागेल जागा लढवाव्या लागेल राजकीय पार्टीचा हा गुणधर्म असतो.या जागा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही लढणार आहोत. पहिले आम्ही कसं लढणार काय लढणार हे ठरवू आणि आमचा अजेंडा सामान्य माणसाचा राहील. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मला तर देणार नाही आणि दिलं तरी मी घेणार नाही आलच वाट्याला तर आमचे राजकुमार पटेल यांना देऊ. आदिवासी आमदार आहे. आम्ही दोनच आमदार असताना मजबुतीने सोबत राहून काम केलं. राजकुमारने आमचा पक्ष मजबूत ठेवला त्यांना देऊ, फुटीचे कारण काय ते दोन दिवस वेळ द्यावा लागेलमी सगळ सांगेल, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

विधान सभा लढविण्या संदर्भात उद्या आमची मुंबईला मिटींग आहे वीस ठिकाणच्या लोकांना आम्ही बोलावलेलं आहे सगळ्यांसोबत चर्चा करून विव्ह रचना आखली जाणार आहे. युतीसोबत किंवा आघाडी सोबत कसं जाता येईल किंवा व्यक्तिगत रित्या कस लढता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत. महायुतीसोबत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही लढू नये युतीसोबत असलो तरी आम्हाला लढणं गरजेचं आहे. आमची पार्टी आहे, आम्हाला हातपाय हलवणे गरजेचे असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

आरएसएसबाबत कडू काय म्हणाले?

मुस्लिम धर्मावर आरक्षण कोणी कबूल करणार नाही त्याच्यातल्या जातीवर आरक्षण द्यायला हवं. सगळ्यांना समान कायदा असल्याने कोणत्याही धर्माचा असला तरीही गरीबासोबत सरकारचा न्याय समान असला पाहिजे. संघाची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे त्यांनी नैतिकता सोडली नाही आणि त्याचेच फटके राष्ट्रीय सोयसेवक संघाने दाखविले आहे अमरावतीमध्ये तर पत्र काढले आणि त्याचा परिणाम ही भोगल्याचं बच्चू कडू म्हणाले.

मनोज जरांगे यांनी आता आंदोलन करू नये, उपोषण मागे घ्यावे. त्यांची प्रकृती वाईट होत असून त्यांची समाजाला गरज आहे. त्यानी जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे आणि त्यांनीच कायदा करावा त्यानी विधानसभेच्या तयारीला लागावं असा सल्ला कडू यांनी जरांगे यांना दिला आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.