Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिठाई दिली त्यांनाच मंत्रिपदे, रामदास कदम यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा भांडाफोड

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करताना रामदास कदम यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांना मिठाई दिल्याशिवाय मंत्रीपद किंवा आमदारकी मिळत नसायची, असा गंभीर आरोपच रामदास कदम यांनी केला आहे. ते येथील एका सभेत बोलत होते.

मिठाई दिली त्यांनाच मंत्रिपदे, रामदास कदम यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा भांडाफोड
ramdas kadamImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 4:04 PM

शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. मी राजकारणात अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिले आहेत. नरेंद्र मोदींना मतं देऊ नका, अशी मुस्लिमांना भीती दाखवली जात आहे. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे. त्यांनी मराठी माणसाला फसवले. मला फसवले.. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसला आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, अशी जहरी टीका करतानाच ज्याने मिठाई दिली त्यांनाच उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदे दिल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.

रामदास कदम यांनी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांचा भांडाफोड केला. उद्धव ठाकरे यांची नस न् नस मला माहीत आहे. सूर्यकांत दळवी आणि माझे मतभेद होते. पण पाच वेळा आमदार निवडून आलेल्या माणसाला विधान परिषद दिली नाही. ज्यांनी मिठाई दिली, त्यांना मंत्रिपदे आणि आमदारकी दिली, असं गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

तुझे माझे जमेना…

रामदास कदम यांनी कालपर्यंत सूर्यकांत दळवी यांच्यावर टीका केली होती. पण आज भरसभेतून त्यांची प्रशंसा केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सूर्यकांत दळवी यांच्यासोबतच्या वादावर रामदास कदम यांनी मिश्किल भाष्यही केलं. तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना अशी आपली स्थिती आहे, असं रामदास कदम म्हणाले.

मिठाईमुळे प्रोजेक्ट बारगळला

कोकाकोला प्रोजेक्ट आणण्यात माझे मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या माध्यमातून केवळ 40 दिवसात मी हा प्रोजेक्ट कोकणात आणला. हा प्रोजेक्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई उद्योग मंत्री असतानाच यायला हवा होता. पण मिठाईमुळे प्रकल्प बारगळला. कंपनी सोबत चर्चा होताना आधी आम्हाला भेटा असे सांगण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.

तेव्हाच समृद्धी येईल

कोयनेचे 67 टीएमसी वाया जाणारे पाणी कोकणात वळवण्याचा ठराव शेवटच्या कॅबिनेटमध्ये संमत झाला होता. 8 हजार कोटीचा निधी या प्रकल्पासाठी लागणार होता. ज्यावेळी हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल तेव्हा कोकणात समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'.
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी.
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा.
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले.
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार.
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा.
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा.
'नाना पटोले शिमग्यातील सोंग', शिंदे-दादांना ऑफर दिल्यानंतर निशाण्यावर
'नाना पटोले शिमग्यातील सोंग', शिंदे-दादांना ऑफर दिल्यानंतर निशाण्यावर.
ते माझे साडू, पण या प्रकरणात आम्ही.., धनंजय देशमुखांचं सडेतोड उत्तर
ते माझे साडू, पण या प्रकरणात आम्ही.., धनंजय देशमुखांचं सडेतोड उत्तर.