‘चूक केली, आता मूव्ह ऑन..’; दलजीत कौरच्या पतीची पोस्ट चर्चेत

| Updated on: Jun 03, 2024 | 12:40 PM

‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीतच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या असून ती मुलासोबत पतीचं घर सोडून भारतात परतली आहे.

चूक केली, आता मूव्ह ऑन..; दलजीत कौरच्या पतीची पोस्ट चर्चेत
दलजीत कौर, निखिल पटेल
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरच्या वैवाहिक आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून समस्या सुरू आहेत. दलजीतने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी तिने दुसरं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच ती पतीला सोडून भारतात परतली. भारतात आल्यानंतर दलजीत आणि निखिलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. सुरुवातीला तिने याविषयी मौन बाळगणं पसंत केलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित पतीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप करताना दिसली. इतकंच नव्हे तर निखिलने लग्नाला मान्यता देण्यास नकार दिल्याचंही तिने म्हटलंय. दलजीतच्या या सर्व आरोपांवर निखिलने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर आता त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ‘एक पाऊल उचलण्यास घाबरून बसण्यापेक्षा झेप घेणं आणि चूक करणं अधिक चांगलं आहे,’ असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हीच पोस्ट शेअर करत निखिलने त्याच्या चुकांमधून शिकल्याचं म्हटलंय. ‘100 टक्के.. मी अशाच पद्धतीने वागतो. चुका करा, ठीक आहे. त्यातून शिका आणि पुढे चला’, असं निखिलने या पोस्टवर लिहिलं आहे.

निखिल पटेलची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निखिल म्हणाला होता, “यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतने मुलाला घेऊन भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही तिथेच विभक्त झालो. आमच्या या मिश्र कुटुंबाचा पाया तितका मजबूत बनू शकला नाही जितकी आम्हाला अपेक्षा होती. दलजीतला केन्यामध्ये राहायला जमत नव्हतं.”

दलजीतसोबतच्या लग्नाबद्दल निखिलने पुढे सांगितलं, “मार्च 2023 मध्ये आम्ही मुंबईत भारतीय विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या विवाहाला सांस्कृतिक मान्यता असली तरी ते कायदेशीररित्या बंधनकारक नाही. त्या सोहळ्याचा हेतू हाच होता की दलजीत माझ्यासोबत केन्याला शिफ्ट होणार असल्याचं आश्वासन तिच्या कुटुंबाला मिळावं. आमच्या अनेक प्रयत्नांनंतरही दलजीतसाठी केन्यामध्ये राहणं खूप आव्हानात्मक झालं होतं. तिला भारतातील तिच्या करिअरची आणि आयुष्याची खूप आठवण येत होती. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील ही गुंतागुंत वाढतच गेली.”