Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, नागराजनं सांगितलं की, “सिनेमा काढून समाज…”

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कविता आणि सिनेमांबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.

‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, नागराजनं सांगितलं की, सिनेमा काढून समाज…
नागराज मंजुळे, दिग्दर्शक
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:46 PM

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे सिनेमे समाजाला अंतर्मुख करणारे असतात. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या तरी आजही तितक्याच ताज्या वाटणाऱ्या प्रश्नावर नागराज मंजुळे यांचे सिनेमे भाष्य करतात. त्यांचा ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा झोपडपट्टीतील मुलं आणि तिथल्या लोकांचं आयुष्य यावर हा सिनेमा बेतलेला आहे. हा सिनेमा सध्या बॉक्सऑफिस गाजवत असताना नागराज यांनी कविता आणि सिनेमांबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत. तसंच “सिनेमा काढून समाज बदलत नाही,” असंही नागराज म्हणाले. पुणे कविसंमेलनात आणि कविसंमेलनानंतरच्या बैठकीत ते बोलत होते.

“जी आत्ता आहे ती संस्कृती हलकट आहे.पण तिचं वय खूप जुनं आहे आणि तुम्ही तिच्याशी जुन्याच शस्त्रांनी लढताय.कवितेने किंवा सिनेमांनी समाज बदलेल असं तुम्हाला वाटतं.पण लय भाबडे लोक आहात तुम्ही. तसं काही होणार नाही. पण आपण लढत रहायला हवं. मी कवितेतून किंवा सिनेमातून फक्त मोकळा होत असतो आणि त्याचे पैसेही मिळतात, ही गोष्ट मला खूप नंतर कळली. कवी होणं किंवा दिग्दर्शक होणं ही माझी कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती. पण आतला जाळ मोकळा करत रहावं माणसांनी… लय थंडावा मिळतो जिवाला…”, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.

नागराज मंजुळे यांच्या सिनेमांइतकंच त्यांच्या कविताही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविता मनात घर करतात. उन्हाच्या कटाविरूद्ध हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे.त्याच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यातील त्याच्या मनातील ‘कोलाहल’ दाखवणारी कविता…

माझ्या हाती नसती लेखणी तर…तर असती छिन्नी सतार, बासरी अथवा कुंचला मी कशानेही उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला…

नागराज यांची ‘मित्र’ ही कविताही अनेकांच्या मनात घर करून आहे. नागराज म्हणतात…

आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जिवलग… एकच ध्येय, एकच स्वप्न घेऊन जगणारे पुढे त्याने आत्महत्या केली आणि मी कविता लिहिली…

संबंधित बातम्या

‘आता आपण फक्त दिवस मोजायचे’; प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

मोबाईलमध्ये शूट झालेला ‘पॉंडीचेरी’ सिनेमा आता ओटीटीवर, 18 मार्चपासून ‘प्लॅनेट मराठी’वर पाहता येणार

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....