Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाज वाटत होती, हात थरथरत होते अन् मी संधी.. ऐश्वर्या रायबाबत बडा अभिनेता असं काही बोलला; भडकली होती अभिनेत्री

अभिनेत्या ऐश्वर्या राय बच्चनसोबत रोमँटिक सीन शूट करण्यावर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया..

लाज वाटत होती, हात थरथरत होते अन् मी संधी.. ऐश्वर्या रायबाबत बडा अभिनेता असं काही बोलला; भडकली होती अभिनेत्री
Ranbir and AishwaryaImage Credit source: YouTube
Follow us
| Updated on: Feb 28, 2025 | 2:40 PM

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटामध्ये आपल्या धमाकेदार केमिस्ट्रीने पडद्यावर आग लावली होती. त्यांच्या ऑन-स्क्रीन रोमान्सची त्यावेळी बरीच चर्चा रंगली होती. एकदा या चित्रपटासंदर्भात एका रेडिओ मुलाखतीदरम्यान रणबीरने ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या त्याच्या रोमान्सबद्दल असे काही सांगितले होते की बच्चन कुटुंबाला देखील राग आला होता. आता रणबीर नेमकं काय म्हणाला होता चला जाणून घेऊया…

‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटामध्ये रणबीर आणि ऐश्वर्याचे काही रोमँटिक सीन दाखवण्यात आले होते. हे सीन शुट करताना रणबीर खूप घाबरला होता. ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करतानाही त्याला लाज वाटल्याचे त्याने कबूल केले होते. ऐश्वर्या एक अनुभवी आणि व्यावसायिक अभिनेत्री आहे. तिला नैसर्गिक पद्धतीने अभिनय करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यामुळे सीन शूट करत असताना तिला सतत ती केवळ अभिनय करत असल्याची जाणीव करुन देण्यात आली होती.

रणबीरने एका रेडिओ चॅनेलला तेव्हा मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तो मजेशीर अंदाजात म्हणाला होता की, ‘त्यावेळी मी विचार केला की, अशी संधी मला कधीच मिळणार नाही. म्हणून मीही जागेवरच चौकार मारला!’ रणबीरचे हे वक्तव्य बच्चन कुटुंबीयांना आवडले नसल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. एका वृत्तपत्राच्या अहवालात असे म्हटले होते की कुटुंबातील एका जवळच्या मित्राने उघड केले की बच्चन कुटुंबाला चित्रपटातील दृश्यांवर कोणताही आक्षेप नव्हता. परंतु त्यांना रणबीरची टिप्पणी चुकीची आणि लाजिरवाणी वाटली. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा मुद्दा समजून घेत रणबीरने लगेचच तो काय बोलला हे स्पष्ट केले होते.

हे सुद्धा वाचा

आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे, असे रणबीर म्हणाला होता. त्याने ऐश्वर्याबद्दलचा आदर व्यक्त केला आणि तिला एक उत्तम अभिनेत्री तसेच जवळची मैत्रिण असे म्हटले. पीटीआयशी बोलताना रणबीर म्हणाला होता की, ‘ऐश्वर्या भारतातील सर्वात प्रतिभावान महिलांपैकी एक आहे. ए दिल है मुश्कीलमधील तिच्या योगदानाबद्दल मी सदैव ऋणी राहीन. मी तिचा असा अपमान कधीच करू शकत नाही.’

विशेष म्हणजे, ऐश्वर्या आणि रणबीर यांची ओळख १९९९ साली झाली होती. रणवीरचे वडील ऋषी कपूर दिग्दर्शित ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटात ऐश्वर्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होती. या चित्रपटासाठी रणबीरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर ‘ए दिल है मुश्किल’मध्ये त्यांचा बॉन्ड आणखी खास झाला.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.