Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dates Benefits: शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचंय? स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर

Benefits of Dates: खजूर खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यापासून ते मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नियमित खजूरचे सेवन करू शकता. दररोज नेमकं किती खजूर खाल्ले पाहिजेल? खजूर खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

Dates Benefits: शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचंय? स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठरेल फायदेशीर
Follow us
| Updated on: Feb 01, 2025 | 3:26 PM

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर तुम्ही दिवसभरामध्ये कधीची खाऊ शकता. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये अतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात

माहितीनुसार, दररोज सकाळी दोन ते तीन खजूर खाणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खजूरमध्ये भरपूर फायबर, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असते ज्याममुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात खजूरचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. खजूर खाल्ल्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य देखील निरेगी राहाते. वाढत्या वयासोबत हाडे कमकुवत होतात त्यामुळे त्यांचं आरोग्य राखण्यासाठी खजूर खाणे फायदेशीर ठरते.

खजूरमध्ये भरपूर प्रमाणात मँगनीज, कॉपर आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. खजूर खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यासोबतच खजूरमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात ज्यामुळे तुम्हाला पोटासंबंधित समस्या होत नाहीत त्यासोबतच अॅसिडिटीच्या समस्या असल्यास दररोज सकाळी रिकाम्यापोटी खजूर खाणे फायदेशीर ठरेल.

\खजूर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच खजूरमध्ये मॅग्नेशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समसस्या होऊ शकतात. खजूरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे सांधिवाताचा त्रास दूर होतो. साधेवाताच्या रूग्णांसाठी खजूर खाणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अशा लोकांनी दररोज खजूर खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास दूर होण्यास मदत करते. ज्या लोकांच्या शरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताची पातळी कमी असेल तर अशा लोकांनी खजूर खाणे फायदेशीर आहे. अशा लोकांनी खजूर खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढते त्यासोबतच शरीरातील उर्जा वाढते.

खजूर खाण्याचे दुष्परिणाम:

जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

खजूर जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढते.

खजूर प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅसच्या समस्या होऊ शकतात.

अॅलर्जी असलेल्या लोकांनी खजूरचे सेवन करू नये.

जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यामुळे तुम्हाला पिंपल्स सारख्या समस्या होऊ शकतात.

बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली
बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली.
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'.
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले.
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने.
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश.
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन.
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल.
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी.
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट.
बावनकुळेंनी भूमिका मांडायला हवी होती, धनंजय देशमुखांनी व्यक्त केली खंत
बावनकुळेंनी भूमिका मांडायला हवी होती, धनंजय देशमुखांनी व्यक्त केली खंत.