AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health: रक्तातील साखरेची कोणती मर्यादा आहे धोकादायक? डायबिटीसबद्दल अनेकांना माहिती नाही या गोष्टी

मधुमेहामध्ये, तुमच्या शरीरातील रक्तातील साखर (रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण) सामान्यपेक्षा जास्त होते. दीर्घकाळापर्यंत ही परिस्थिती राहणे धोकादायक आहे.

Health: रक्तातील साखरेची कोणती मर्यादा आहे धोकादायक? डायबिटीसबद्दल अनेकांना माहिती नाही या गोष्टी
मधुमेह Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 14, 2022 | 1:08 PM
Share

मुंबई, भारतात मधुमेह (Diabetes)  हा सर्वात सामान्य आजार झाला आहे. लोकं मोठ्या प्रमाणात या आजाराला बळी पडत आहेत, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागरूकतेचा (Awareness) अभाव आणि चुकीची जीवनशैली. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.  रक्तातील साखरेशी संबंधित महत्वाची माहिती  प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे.

मधुमेहामध्ये, तुमच्या शरीरातील रक्तातील साखर (रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण) सामान्यपेक्षा जास्त होते. दीर्घकाळापर्यंत रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे, व्यक्तीला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. अनेक वेळा मधुमेहाच्या आजारात रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी आणि जास्त असणे ही धोकादायक स्थिती असते. रक्तातील साखर कमी झाल्यामुळे रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.

सामान्य रक्त शर्करा काय आहे

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, सकाळी उपश्यापोटी रक्तातील साखर 100 mg/dL पेक्षा कमी असावी. 100 mg/dL म्हणजे तुमची रक्तातील साखर सामान्य आहे.

रक्तातील साखर वाढल्यास काय होते?

उच्च रक्तातील साखरेचा अर्थ असा आहे की तुमच्या रक्तात खूप जास्त साखर आहे आणि तुमच्या शरीरात इन्सुलिनची कमतरता आहे ज्यामुळे तुमची साखरेची पातळी नियंत्रित करता येत नाही. ही स्थिती अनेक कारणांमुळे उद्भवू शकते, ज्यामध्ये अन्नातून पुरेसे इन्सुलिन न मिळणे, खूप कमी व्यायाम, अति खाणे, तणाव, हार्मोनल बदल आणि झोप न लागणे.

उच्च रक्तातील साखर धोकादायक आहे. याचा अर्थ असा की सामान्यत: कोणत्याही दिवशी तुमच्या रक्तातील साखर वाढली असेल तर ती तुमच्यासाठी धोकादायक आहे असे नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या दिवशी तुमची आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर वाढली तर ती जास्त काळ टिकणार नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीला जास्त काळ रक्तातील साखरेची समस्या असेल आणि ज्याची साखरेची पातळी 200 mg/dL च्या आसपास राहिली असेल, तर त्याला मधुमेहाशी संबंधित मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

उच्च रक्तातील साखरेची लक्षणे काय आहेत?

उच्च रक्तातील साखरेची लक्षणे तीव्रतेनुसार बदलू शकतात. जेव्हा तुमची साखरेची पातळी धोकादायक स्थितीच्या उंबरठयावर असते तेव्हा उच्च रक्तातील साखरेची सुरुवातीची लक्षणे म्हणजे जास्त तहान, वारंवार लघवी, थकवा, तीव्र स्नायू दुखणे, अंधुक दृष्टी आणि डोकेदुखी.

उच्च रक्तातील साखरेच्या गंभीर लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, कोरडे तोंड, वजन कमी होणे, अशक्तपणा, अत्यंत थकवा, गोंधळ, तीव्र स्नायू दुखणे, दृष्टी धूसर होणे, श्वास घेण्यात अडचण आणि कोमा यांचा समावेश होतो.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.