Carrot Juice : त्वचेपासून ते ब्लड शुगरपर्यंत, गाजराच्या ज्यूसमुळे मिळतात जबरदस्त फायदे

गाजराचा रस केवळ दृष्टी सुधारण्यास मदत करत नाही तर त्वचा चमकदार ठेवण्यास देखील मदत करतो. त्याचे अनेक फायदे जाणून घेऊया.

Carrot Juice : त्वचेपासून ते ब्लड शुगरपर्यंत, गाजराच्या ज्यूसमुळे मिळतात जबरदस्त फायदे
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 10:18 AM

नवी दिल्ली : फळे आणि भाज्यांच्या रसातून (vegetables and fruits) आपल्याला असे अनेक फायदे मिळू शकतात, जे निरोगी राहण्यासाठी खूप आवश्यक आहेत. सर्व रसांप्रमाणे गाजराचा रस (carrot juice) देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे केवळ दृष्टी सुधारण्यास मदत करते असे नाही तर त्वचा चमकदार ठेवण्यास देखील मदत करते. एवढेच नाही तर गाजराचा हा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (controls blood sugar) ठेवण्यासही उपयुक्त ठरू शकतो.

गाजरामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी एकत्र काम करतात. हे रोज खाल्ल्याने कॅलरीजही वाढत नाहीत. गाजरात अ, क आणि के जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे कॅरोटीनॉइड पिगमेंट्स देखील असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. गाजर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासही उपयुक्त आहे.

आहारात गाजराचा रस समाविष्ट केल्याने हे 5 फायदे मिळू शकतात.

हे सुद्धा वाचा

1) डोळ्यांसाठी फायदेशीर : गाजरात अनेक आवश्यक पोषक घटक असल्याने ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते, जे आपल्या डोळ्यांसाठी आवश्यक आहे. त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन देखील आढळते, जे हानिकारक प्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करते. गाजराचा रस प्यायल्याने ‘मॅक्युलर डिजनरेशन’ या वयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो आणि डोळ्यांशी संबंधित इतर समस्यांची शक्यताही कमी होते.

2) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त : भाज्या असोत किंवा भाज्यांचा रस, हे दोन्ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. गाजराच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळण्याचे काम करतात.

3) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते : मधुमेह असलेल्या रुग्णांनी कमी-ग्लायसेमिक निर्देशांक असलेले अन्न खाणे आवश्यक आहे. कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात. गाजराच्या रसामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. यामुळेच मधुमेही रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

4) त्वचेसाठी फायदेशीर : गाजराच्या रसात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते. गाजराच्या रसामध्ये कॅरोटीनोइड्स आढळतात, जे त्वचेला अतिनील हानीपासून वाचवण्याचे काम करतात.

5) यकृतासाठी फायदेशीर : गाजराच्या रसामध्ये असलेले कॅरोटीनोइड्स त्यांच्या अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. हे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) पासून यकृताचे संरक्षण करण्यास मदत करते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.