AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Depression: ऑफीसमध्ये जास्त वेळ काम केल्याने येऊ शकते नैराश्य; असा करा ताण दूर!

एका अभ्यासानुसार असे नमूद करण्यात आले आहे की, खराब ऑफीस कल्चरमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचा धोका तिप्पट वाढतो. कोणताही ब्रेक घेतल्याशिवायय कित्येक तास सलग काम केल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं.

Depression: ऑफीसमध्ये जास्त वेळ काम केल्याने येऊ शकते नैराश्य; असा करा ताण दूर!
कामाचा ताण Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 16, 2022 | 11:50 AM
Share

गेल्या आठवड्यात ‘ बॉम्बे शेव्हिंग कंपनी’चे सीईओ शंतनू देशपांडे यांनी लिंक्डइनवर लिहीलेल्या एका पोस्टमुळे टॉक्सिक वर्क कल्चरवर (Work Culture) चर्चा रंगली होती. या पोस्टमध्ये शंतनू यांनी फ्रेशर्स आणि जेन झेड वर्कफोर्स यासाठी सल्ला दिला होता, तक्रार न करता दिवसातून 18 तास काम करण्याची शिफारस शंतनू यांनी केली होती. मात्र त्याचा हा मुद्दा लोकांना मुळीच पटला नाही. ऑफिसमध्ये जास्त वेळ सलग काम केल्याने (long working hours) मानसिक आरोग्य (mental health) बिघडू शकतं, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याशिवाय लठ्ठपणासारख्या (obesity) समस्याही उद्भवू शकतात. एका अभ्यासानुसार, ऑफीसमध्ये सपोर्टिव्ह वर्क एनव्हॉयर्मेंट ( सकारात्मक वातावरण ) नसेल तर त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो. खराब ऑफीस कल्चरमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचा (Depression) धोका तिप्पट वाढतो, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

नैराश्याची सौम्य प्रकरणे बाजूला करत जेव्हा संवेदनशील विश्लेषण करण्यात आले तेव्हा LWH (41-48 आणि ≥55- तास / आठवडा) हे भविष्यातील नैराश्याच्या लक्षणांशी संबंधित असल्याचे आढळले. PSCमध्ये (Psychological Safety Climate) कमतरता ही कामाच्या दीर्घ तासांमुळे (LWH- Log Working hours) नव्हती , असे दिसून आले. पीएससीचा कामाच्या दीर्घ तासांशी संबंध नव्हता.

जास्त काळ डेस्कवर काम करणे ठरू शकते धोकादायक –

संशोधकांनी बसून काम करण्याची वेळ आणि इतर क्रिया यांच्या स्तरासाठी 13 अभ्यासांचे विश्लेषण केले. जे लोक किंवा ज्या व्यक्ती कोणतीही शारीरिक हालचाल न करता दिवसात 8 तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहतात, त्या व्यक्तींना लठ्ठपणा आणि धूम्रपान केल्याने होतो, तितकाच मृत्यूचा धोका असतो. तथापि, इतर अभ्यासातून 10 लाखांहून अधिक लोकांचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीनुसार, असे आढळले की, 60 ते 75 मिनिटे शारीरिक हालचाल करणे हे (व्यायाम, चालणे) एका दिवसात बराच काळ बसून राहिल्यामुळे जे परिणाम होतात, त्याविरोधात प्रभावी ठरते. ज्यांचा सिटिंग टाईम सर्वात जास्त ॲक्टिव्ह (सक्रिय) असतो, त्यांच्या मृत्यूचा धोका कमी होतो.

या उपायांनी ताण होईल दूर –

गुरुग्राम येथील ‘ स्टेप्स सेंटर फॉर मेंटल हेल्थ’ चे बाल आणि किशोरवयीन मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. प्रमीत रस्तोगी यांच्या सांगण्यानुसार, खूप वेळ काम करत असताना स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही वेळ ब्रेक घ्यावा. दिवसभरात थोडी-थोडी हालचाल करावी. काम करताना थोडा ब्रेक घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय आपलं शरीर हायड्रेटेड ठेवणंही महत्वाचं आहे. बरेचसे लोक याकडे दुर्लक्ष करतात. एअर कंडीशन असलेल्या ऑफीसमध्ये सतत बसून काम केल्याने जास्त तहान लागत नाही, त्यामुळे नीट पाणी प्यायले जात नाही व परिणामी थकवा येतो. त्यामुळे थोड्या -थोड्या वेळाने पाणी पित राहणे, महत्वाचे आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.