Health : महिलांनो या कारणामुळेही गळतात केस, वेळीच लक्ष द्या नाहीतर पडू शकतो टक्कल, जाणून घ्या

केसगळतीमुळे महिला नेहमी त्रस्त असतात. त्यात बहुतेक महिलांना PCOD, PCOS चा त्रास असतो. तर अनेकांना माहिती नसेल की PCOD, PCOS मुळे केस गळती होते.

Health : महिलांनो या कारणामुळेही गळतात केस, वेळीच लक्ष द्या नाहीतर पडू शकतो टक्कल, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 7:03 PM

मुंबई : सध्याच्या काळात बदलती जीवनशैली, प्रदुषण, ताण-तणाव अशा अनेक गोष्टींमुळे केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसते. आजकाल तर बहुतेक लोकांना केसगळतीची समस्या सतावत असते. यामध्ये मग महिलांना केसगळतीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. आजच्या काळामध्ये अनेक मुलींना PCOS, PCOD चा त्रास असतो यामुळे बहुतेक मुलींना मासिक पाळी नियमित होत नाही. अशावेळी दोन ते तीन महिन्यानंतर महिलांना मासिक पाळी येत असते.

पीसीओएसमुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये वजन वाढणे, चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, केस गळणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यात गर्भधारणाशी संबंधित देखील समस्या निर्माण होताना दिसतात. यामध्ये पीसीओएसमुळे महिलांचे केस मोठ्या प्रमाणात गळतात मग टक्कल देखील पडण्याची शक्यता असते.

पीसीओएसचा त्रास असलेल्या महिलांमध्ये एंड्रोजन हार्मोन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पण हे हार्मोन्स महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असतात. पण पीसीओएसमध्ये हार्मोन्स महिलांच्या शरीरात वाढतात तेव्हा त्यांच्या डोक्यावरचे केस गळायला लागतात.

पीसीओएसमुळे महिलांच्या शरीरातील हार्मोनलचे असंतुलन खूप वाढते. याचा परिणाम पीरियड सायकलवर होत असतो. हार्मोन्सचे संतुलन इतके बिघडते की महिलांच्या केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. त्यामुळे महिलांचे केस पातळ होतात आणि केस गळतीची समस्या निर्माण होते.

केस गळतीच्या या समस्येपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर, तुमच्या आहारामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, कॅल्शियम असलेल्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच बाहेरचे पदार्थ खाणे टाळायला हवे. सोबतच प्रत्येकाने व्यायाम, योगासने करणे गरजेचे आहे. जर तुमचे वजन वाढले असेल तर तुमचं अतिरिक्त वजन कमी करणे गरजेचे आहे. कारण वाढलेले वजन तुमचे असंतुलित हार्मोन्स बदलते आणि याचा तुमच्या केसांवर परिणाम होतो. त्यामुळेच फिट राहणं खूप गरजेचं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.