Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता भारताला ‘या’ आजाराचा विळखा, कोरोनापेक्षाही आहे महाभंयकर, वाचा ‘WHO’ चा रिपोर्ट

टीबी कोरोना महामारीपेक्षा अधिक धोकादायक आणि संक्रामक असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा रिपोर्ट समोर आला आहे. टीबी हा अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार असून त्यातून दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

आता भारताला 'या' आजाराचा विळखा, कोरोनापेक्षाही आहे महाभंयकर, वाचा ‘WHO’ चा रिपोर्ट
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 9:12 PM

जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार भारतासह पाच देशांमध्ये टीबीचे सर्वाधिक रुग्ण असून टीबी हा कोरोना पेक्षाही धोकादायक संसर्गजन्य आजार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. भारतात टीबीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात, असाही यात उल्लेख आहे.

टीबी हा अतिशय धोकादायक संसर्गजन्य आजार आहे. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो हे फार कमी लोकांना माहित आहे.

जागतिक क्षयरोग अहवाल काय सांगतो?

भारतात टीबीचे 26 टक्के, इंडोनेशियात 10 टक्के, चीनमध्ये 6.8 टक्के, फिलिपिन्समध्ये 6.8 टक्के आणि पाकिस्तानात 6.3 टक्के रुग्ण आढळले आहेत. जागतिक क्षयरोग अहवाल 2024 नुसार जागतिक स्तरावर या आजाराचे प्रमाण 56 टक्के आहे.

भारतात टीबीचे सर्वाधिक रुग्ण

जागतिक स्तरावर टीबी हा आजार 55 टक्के पुरुष, 33 टक्के महिला आणि 12 टक्के मुले आणि तरुणांमध्ये आढळतो. भारताने 2025 पर्यंत देशातून टीबी या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी अजूनही भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत.

2023 मध्ये अंदाजे 8.2 दशलक्ष लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. टीबीशी संबंधित मृत्यूंची संख्या 2022 मधील 1.32 दशलक्षवरून 2023 मध्ये 1.25 दशलक्षपर्यंत कमी झाली आहे, जरी टीबीमुळे आजारी पडणाऱ्यांची एकूण संख्या किंचित वाढून 2023 मध्ये अंदाजे 10.8 दशलक्ष झाली आहे, अशी माहिती डब्ल्यूएचओच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमुद करण्यात आली आहे.

टीबीचा आजार का होतो?

टीबीचा आजार मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. जेव्हा एखादी व्यक्ती या टीबी जीवाणूच्या संपर्कात येते तेव्हा हा जीवाणू श्वासाद्वारे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. ज्यानंतर तो फुफ्फुसात स्थिरावतो, ज्यामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ लागतो. हे बॅक्टेरिया संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतात. संक्रमित व्यक्तीच्या खोकला आणि शिंकण्यामुळे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतात.

टीबीचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत खोकला, त्यामुळे जर खोकला तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ कायम राहिला तर त्याची तपासणी करून पूर्ण खबरदारी घेऊन त्यावर योग्य उपचार करून घ्यावेत.

उपचार शक्य आहे का?

चांगली गोष्ट म्हणजे या आजारावर उपचार पूर्णपणे शक्य आहेत. पण एकदा उशीर झाला की रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सतत खोकला येत असेल तर त्याची तपासणी करून योग्य उपचार करावेत.

टीबी आजाराची लक्षणं कोणती?

खोकला, खोकल्यासह रक्त, छातीत दुखणे जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा खोकला येणे, ताप, थंडी, रात्री घाम येणे, वजन कमी होणे, खाण्याची इच्छा कमी होणे, थकवा जाणवणे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.