Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐsss शाबास! 9 बायकांशी लग्न, नऊही जणींना शारीरिक सुखी ‘समाधानी’ ठेवण्यासाठी नवऱ्याचा खत्रूड प्लॅन

लग्न लागलं. संसार सुरु झाला. आता प्रश्न निर्माण झाला, तो कोणत्या बायकोला किती वेळ द्यायचा, याचा!

ऐsss शाबास! 9 बायकांशी लग्न, नऊही जणींना शारीरिक सुखी 'समाधानी' ठेवण्यासाठी नवऱ्याचा खत्रूड प्लॅन
9 बायका आणि फजितीच्या पलिकडची गोष्ट ऐका...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 10:44 PM

मुंबई : एक बायको (wife) सांभळताना अवघड, याने तर एकापेक्षा जास्त केल्यात. दोन, तीन नव्हे तर चक्क नऊ बायका केलेल्या एका नवऱ्याची गोष्ट खास असणार, हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? कारण एकाच वेळी नऊ जणींना त्याला खूशही ठेवायचं आणि खऱ्या अर्थानं शारीरीक सुखाच्या बाबतीत समाधानीदेखील ठेवयायं, हे ‘खायचं’ काम नाही! आता हे शारीरीक सुख (Physical satisfaction) देण्यासाठी आपल्या नऊ बायकांना कसं मॅनेज करायचं, हा प्रश्न या तरुणाला पडणं स्वाभाविकच होतं. तसा तो पडलाही. त्यासाठी त्यानं जे केलं, ते खतरनाकच आहे. एका वेळी नऊ मुलींसोबत संसार करणारा हा तरुण मूळचा ब्राझिलचा. त्याचं नाव आर्थर. पूर्ण नाव आर्थर ओउर्सो (Arthur O Urso). आर्थरनं एकाच वेळी नऊ मुलींशी लग्न केलं. आयुष्यात एकीशीच काय लग्न करायचं, या कॉन्सेप्टला छेड देत त्याने नऊ जणांनी संसार करण्याचं ठरवलं. नऊ जणींशी लग्न केलंही. पण नऊ जणींना सांभाळणं किती कठीण, हे एकीला सांभाळणाराही समजू शकतो. त्यामुळे मग या नऊ जणींना सांभण्यासाठी, त्यांचे मूड जपण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना शारीरिक सूखी आणि समाधानी देण्यासाठी ब्राझीलच्या या पठ्ठ्यानं जालीम उपाय शोधून काढला.

काय होता उपाय?

ब्राझीलने शोधून काढलेला उपाय होता आलटून पालटून वेगवेगळ्या बायकांना वेळ देण्याचा. त्यासाठी खास वेळापत्रकही त्यानं बनवलं. त्यानं बनवलेल्या या वेळा पत्रकाला शुद्ध भाषेत सेक्स रोस्टर असं म्हणतात. एएनआयनं याबाबतची माहिती दिली आहे. प्रेम करण्याचं स्वातंत्र आणि फक्त एकदाच काय लग्न करायचं, या दोन्ही गोष्टी फॉलो करत ब्राझीलच्या आर्थरनं नऊ वेळा लग्न केलं. सगळ्यात आधी त्यानं एकीशीच लग्न केलं होतं. त्यानंतर त्यानं आठ जणींशी विवाह केला. महत्त्वाचं म्हणजे आठही जणी त्याच्याशी लग्न करायला तयारही झाल्या.

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

अरे संसार संसार

लग्न लागलं. संसार सुरु झाला. आता प्रश्न निर्माण झाला, तो कोणत्या बायकोला किती वेळ द्यायचा, याचा! शिवाय प्रत्येक बायकोला मानसिक सुख तर द्यायचं आहेच. पण शारीरिक सुखही तितकंच गरजेचं आहे. कुणालाही निराश करुन चालणार नाही, हे आर्थर जाणून होता. म्हणूनच मग त्यानं एक खास वेळापत्रक बनवलं. आता हे वेळापत्रक फॉलो करणं किती खतरनाक असेल, तरं तुम्हाला वाटू शकतं. पण खतरनाक असण्यापेक्षाही आर्थरसाठी ते प्रचंड थकवणारं होतं.

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

एकीला शरीर सुख देताना डोक्यात दुसरीचेच विचार यायचे, असं आर्थननं सांगितलंय. हा प्रकार त्यांच्यासाठी प्रचंड थकवणारा असा होता, असं त्याने म्हटलंय. सातत्यानं शरीर सुख देण्याचे प्रकार सुरु असल्यानं त्यातला आनंद दूर जाऊन फक्त समाधानासाठी आपण ती गोष्ट करतोय, अशी भावनाही निर्माण होत असल्याची शंका आर्थरच्या मनात येऊ लागली होती. शेवटी त्यानं हे वेळापत्रक फॉलो करणं वैतागून सोडूनच दिलं.

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

बायका.. त्या बायकाच!

यापुढे आर्थरनं सांगितलेला किस्सा त्याहून भारी आहे. नऊ बायका होत्या. शरीर सुखासाठी वेळापत्रक तयार होतं. त्यामुळे कोणत्याच बायकोला याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. पण जेव्हा आर्थर आपल्या बायकांना महागड्या भेटवस्तू देऊ लागलं. त्यानंतर मात्र बायका कमालीच्या रागवायच्या. रुसाच्या. हिरमुसून जायच्या. म्हणजे शरीरापेक्षाही भेटवस्तूंवरुन भांडणं होण्याचे प्रकार या बायकांसाठी महत्त्वाची होती, असंच आर्थरच्या सांगण्यावरुन दिसतंय. आता या नऊ बायकांमधील त्याची एक बायको त्याच्यापासून वेगळ्या होण्याच्या विचारात आहे. तशी मागणीही तिनं केली आहे. आता प्रेम करण्याचं स्वातंत्र देण्याच्या कॉन्सेप्टवर इतक्या जणींशी लग्न केलेला आर्थर आपल्या त्या बायकोला जगण्याचं स्वातंत्र देणार का, याचीही बातमी एएनआय देणार का, यावर आम्हीची बारीक नजर असणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून…

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.