Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; जवळच्या माणसांनीही सोडून दिला हात…

पाकिस्तानविरोधातील कटांचा पर्दाफाश करत राहतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना हिंसक राजकारण करण्यापासून रोखण्याचा पक्ष नेतृत्वातील कोणत्याही नेत्याने प्रयत्न केला नाही असा आरोप त्यांनी इम्रान खान यांच्यावर केला आहे.

इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; जवळच्या माणसांनीही सोडून दिला हात...
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 10:22 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी मानवाधिकार मंत्री डॉ. शरीन मजारी यांनी तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता खळबळ उडाली आहे. त्या इम्रान खान यांच्या अत्यंत जवळच्या नेत्या मानल्या जातात. त्यांना मंगळवारी पाचव्यांदा अटक करण्यात आल्याने पाकिस्तान चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत की सरकार आणि लष्कराच्या कारवाईला मजारी शाहबाज शरीफ घाबरले आहेत का? असा खोचक सवाल उपस्थित केला जात आहे.

इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्या आजपासून पीटीआय किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा भाग असणार नाहीत असंही सांगण्यात येत आहे.

मजारी यांनी राजकारण सोडल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच त्यांनी मुलीच्या परीक्षेचा हवाला देत काही कारणं स्पष्ट केली आहेत.

पाच महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाल्याचेही त्यांनी कारण सांगितले आहे. ते जिवंत असताना खूप काही करता आले असते कारण त्यांनी मुलांची काळजी घेतली असती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या मुळे मुलांचा आणि आरोग्याचाही प्रश्न निर्माम झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मजारी यांना अटक झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या आहेत. तर 9 मे रोजी पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती.

त्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती आणि लष्करी अधिकाऱ्यांची यावेळी घरेही जाळण्यात आली होती. त्यानंतर, मजारीसह किमान पीटीआयच्या 13 नेत्यांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती मात्र, त्यांना त्यानंतर न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता.

शिरीन मजारी यांच्यानंतर पीटीआयची आणखी एक विकेट पडली आहे. फय्याजुल हसन चौहान यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.

त्यांना वरिष्ठ पातळीवरचे नेते समजले जात होते. त्यांनी लष्कराचे जोरदार कौतुक केले आहे. ते म्हणाले होते की, यांचे कुटुंब लष्कराच्या प्रेमात बुडाले आहे.

तसेच यापुढेही पाकिस्तानविरोधातील कटांचा पर्दाफाश करत राहतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना हिंसक राजकारण करण्यापासून रोखण्याचा पक्ष नेतृत्वातील कोणत्याही नेत्याने प्रयत्न केला नाही असा आरोप त्यांनी इम्रान खान यांच्यावर केला आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.