Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषी सुनक पंतप्रधान होताच, भारतासाठी त्यांनी दिली ही गुड न्यूज; व्यापार आणि रोजगार वेगाने वाढणार…

मुक्त व्यापार करार हा दोन्ही देशांसाठी फायदेशीर असल्याचे मत ब्रिटनचे आहे. त्यामुळे भारत आणि ब्रिटनने या वर्षी जानेवारीत एफटीएसाठी बोलणी सुरू केली होती.

ऋषी सुनक पंतप्रधान होताच, भारतासाठी त्यांनी दिली ही गुड न्यूज; व्यापार आणि रोजगार वेगाने वाढणार...
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 4:29 PM

नवी दिल्लीः ब्रिटनने या वर्षी 3 पंतप्रधानांचा कार्यकाळ पाहिला आहे. राजकीय आणि आर्थिक संकटामुळे देशाची कमान वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातात गेल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. ब्रिटनच्या या राजकारणाचा परिणाम फक्त ब्रिटनवरच झाला नाही असं नाही तर त्याचा भारतावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. भारत आणि ब्रिटनमधील (Britain) मुक्त-व्यापार करार (Free-Trade Agreement) यंदाच्या दिवाळीपर्यंत पूर्ण होणार होता.

मात्र तेथील देशांतर्गत राजकारण इतर काही गोष्टीमध्ये अडकल्याने जानेवारीपासून सुरू झालेली मुक्त व्यापार कराराची ही प्रक्रिया दिवाळीनंतरही पूर्ण होऊ शकली नाही.

मात्र आता ब्रिटनची कमान भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या हाती गेल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे ब्रिटनने आता भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याचे आता जाहीर केले आहे.

मुक्त व्यापार करार हा दोन्ही देशांसाठी फायदेशीर असल्याचे मत ब्रिटनचे आहे. त्यामुळे भारत आणि ब्रिटनने या वर्षी जानेवारीत एफटीएसाठी बोलणी सुरू केली होती.

दिवाळीपर्यंत या वाटाघाटीही पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र ब्रिटनमधील राजकीय पेचप्रसंग वाढले असल्याने व अनेक मुद्द्यांवर एकमत न झाल्याने मुक्त व्यापार करार होऊ शकला नाही.

पण आता ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव ग्रेग हँड् यांनी सांगितले की, आम्ही या संदर्भातील चर्चा पूर्ण केली आहे.

आणि आता लवकरच चर्चेच्या पुढील गोष्टींसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांनी सांगितले की, भारत एक ‘आर्थिक महासत्ता’ आहे. जो 2050 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती असणार आहे. असे गौरवोद्गगारही काढले आहे.

ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव ग्रेग हँड्स यांच्या मते, मुक्त व्याापार करारामुळे ब्रिटन आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंधही मजबूत होणार आहेत.

या करारामुळे आर्थिक वाढ आणि नोकऱ्यांमध्येही वाढ होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

ब्रिटनमधील राजकीय स्थिरता आता मुक्त व्यापार करार करण्याच्या प्रक्रियेला चालना दिली जाणार आहे. त्यामुळे 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊ शकणार आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.