property mutation : आपण कोणतीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर तहसीलमध्ये त्याची नोंद केली की मालक झालो असं समजतो. पण तुम्हाला ही गोष्ट माहित हवी की, नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला त्या मालमत्तेचे मालक होण्यासाठी आणखी एका ठिकाणी नोंद करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दुकान, प्लॉट किंवा घर खरेदी केल्यानंतर विक्रेत्याला संपूर्ण रक्कम देऊन टाकता. याची नोंदणी करूनही तुम्ही त्या मालमत्तेचे पूर्ण मालक होत नाही. त्यासाठी तुम्हाला आणखी एक ठिकाणी नोंद करावी लागेल जेणेकरुन पुढे वाद निर्माण होणार नाही.
एकाच व्यक्तीने एक मालमत्ता दोन किंवा त्याहून अधिक लोकांना विकल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. विक्रेत्याने विकलेल्या मालमत्तेची खरेदीदाराच्या नावे नोंद करूनही जमिनीवर कर्ज घेतले जाते अशी ही बातमी तुम्ही ऐकली असेल. हे सगळे घडते कारण जमीन खरेदीदाराने फक्त नोंदणी केली आहे. त्याने त्याची मालमत्ता त्याच्या नावावर हस्तांतरित केलेली नाही.
भारतीय नोंदणी कायद्यानुसार, 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे हस्तांतरण झाल्यास ते लिखित स्वरूपात असावे. त्याची नोंदणी उपनिबंधक कार्यालयात केली जाते. हा नियम संपूर्ण देशात लागू आहे आणि त्याला नोंदणी म्हणतात. पण केवळ नोंदणी केल्याने तुम्ही जमीन, घर किंवा दुकानाचे पूर्ण मालक होत नाही. नोंदणीनंतर म्यूटेशन करणे देखील खूप महत्वाचे असते.
रजिस्ट्री हा केवळ मालकी हस्तांतरणाचा दस्तऐवज आहे. मालकीचा नाही. त्यामुळे मालमत्तेची नोंदणी झाल्यानंतर तुम्ही त्या नोंदणीच्या आधारे म्यूटेशन करुन घ्या. तेव्हा तुम्ही त्या मालमत्तेचे पूर्ण मालक बनता. त्यामुळे म्यूटेशन केल्यानंतरच निवांत व्हा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा.