Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कथा देशातील पहिल्या नाण्याची, जाणून घ्या इंग्रजांनी या नाण्याला का आणले होते?

एक रुपयांच्या किमतीचे नाणे ईस्ट इंडिया कंपनीने जारी केले. हे नाणे कोलकात्यात तयार झाले

कथा देशातील पहिल्या नाण्याची, जाणून घ्या इंग्रजांनी या नाण्याला का आणले होते?
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 9:54 PM

नवी दिल्ली : भारतातील नाण्यांची एक वेगळी कथा आहे. एक रुपयाच्या नाण्याचा इतिहास विशेष आहे. कारण त्यावेळी देशात वेगवेगळ्या नाण्यांचं चलन होतं. हे नाणे व्यापारात अडचण निर्माण करत होते. याच अडचणींचा सामना करण्यासाठी एक रुपयांचे नाणे आणण्यात आलं. आजपासून २६६ वर्षांपूर्वी १९ ऑगस्ट रोजी १७५७ मध्ये भारतात नाण्याच्या रुपात पहिल्यांदा एक रुपया तयार झाला. सुरुवातीला हे मर्यादित प्रमाणात होते. पण, इतिहासात ही तारीख नोंदवली गेली.

कोलकात्यात तयार करण्यात आले नाणे

एक रुपयांच्या किमतीचे नाणे ईस्ट इंडिया कंपनीने जारी केले. हे नाणे कोलकात्यात तयार झाले. प्लासीची लढाई संपली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटीशराज सुरू झाले होते. ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला हे नाणे मुघल प्रांतात चालवले.

वेगवेगळे नाणे असल्याने अडचण

त्यावेळी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नाणी होती. व्यवसायात अडचणी येत होत्या. १८३५ साली युनिफार्म कॉईन अॅक्ट पारीत झाला. देशात एकचं नाणे प्रचलित झाले. वेगवेगळ्या नाण्यांचे चलन संपुष्ठात येऊ लागले. तेव्हापर्यंत इंग्रजांनी संपूर्ण देशावर ताबा मिळवला होता. नाण्यावर ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचे फोटो छापले जात होते. यापैकी महाराणी व्हिक्टोरियाचा फोटो प्रमुख स्थानी होता.

ईस्ट इंडिया कंपनीने १६१३ मध्ये पहिल्यांदा नाणे तयार करणारी कंपनी सुरतमध्ये स्थापित केली. त्यानंतर अहमदाबाद आणि बॉम्बे येथे कंपनीची स्थापना झाली. परंतु, एक रुपयांचे नाणे पहिल्यांदा कोलकात्यात तयार झाले. ती तारीख होती १९ ऑगस्ट १७५७.

आधी असे चालत होते नाणे

एक रुपयांचे नाणे पहिल्यांदा कोलकात्यात तयार झाले. त्यापूर्वी गोल्ड, कॉपर, सिल्व्हरचे नाणे राहत होते. त्यांना अनुक्रमे कॅरोलिना, एंजलीना आणि कॉपरून म्हटले जात होते. स्वतंत्र भारताव्यतिरिक्त १९५० पर्यंत ब्रिटीशकालीन नाणे देशात प्रचलित होते. त्यानंतर भारताने स्वतःचे नाणे तयार केले. १९६२ मध्ये एक रुपयांचे नाणे प्रचलित झाले. ते आजही बाजारात आहे. त्याच्या डिझाईनमध्ये बदल झाला. परंतु, नाण्याच्या किमतीत बदल झाला नाही.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.