अशोक चव्हाण २ वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडण्याची, काँग्रेस सोडण्याची त्यांची योजना होती असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला.

अशोक चव्हाण २ वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 10:27 AM

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडण्याची, काँग्रेस सोडण्याची त्यांची योजना होती असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

गेली अनेक दशके काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काल काँग्रेसमधून बाहेर पडले. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

२ वर्षांआधीच सोडणार होते पक्ष

अशोक चव्हाण हे आत्ताच नव्हे तर गेल्या काही काळापासूनच पक्ष सोडण्यासाठी धडपडत आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हाच चव्हाण यांचीही काँग्रेसमधून बाहेर पडण्याची धडपड सुरू होती. आता त्यांना बाहेर पडायला मुहुर्त मिळाला असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.

अशोक चव्हाण स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत

अशोक चव्हाण यांनी स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. आदर्श घोटाळा केलेले लोक तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. जनता तुमच्यावर थुंकत आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य केलं तसेच भाजपवरही टीका केली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.