Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 53 टक्के मतदान

आता बिहार विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि अंतिम टप्पा 7 नोव्हेंबरला पार पडेल. यानंतर 10 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. | Bihar Election 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 53 टक्के मतदान
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 11:01 PM

पाटणा: गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2020 ) टप्प्यात जवळपास 53.51 टक्के इतके मतदान झाले. 94 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानप्रक्रियेत मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, तेजस्वी यादव, लोजप प्रमुख चिराग पासवान या दिग्गज नेत्यांनी मतदान केले. तर तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यासह 1450 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आता बिहार विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि अंतिम टप्पा 7 नोव्हेंबरला पार पडेल. यानंतर 10 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडी विरुद्ध भाजप आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेड (JDU) यांच्यात लढत होत आहे. (Bihar Election second phase voting completed)

तर दुसरीकडे बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळीही पाहायला मिळाली. यावेळी हरलाखी येथील प्रचारसभेत नितीश कुमार यांना कांदे फेकून मारण्यात आल्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात येताच नितीश कुमार यांच्या अंगरक्षकांनी तात्काळ त्यांच्याभोवती सुरक्षाकडे तयार केले. यानंतरही नितीश कुमार तावातावाने भाषण देत राहिले. अजून कांदे फेका, फेकत राहा, याचा काहीही परिणाम होणार नाही, असे नितीश कुमार यांनी म्हटले. या घटनेची आज दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत महाआघाडीवर जोरदार टीका केली. बिहारमध्ये जंगलराज आणणाऱ्यांना ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीराम’चा अडचण वाटते. बिहारच्या जनतेने या लोकांपासून सतर्क राहत त्यांना चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 53.54 टक्के मतदान झाले होते. 243 जागांपैकी 71 मतदारसंघांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 54.94 टक्के मतदान झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर्स अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच कोरोना रुग्ण आणि दिव्यांगांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की

तेजस्वी यादवांचे टीकाकार 10 तारखेला ‘खामोश’ होणार, शत्रुघ्न सिन्हांची फटकेबाजी

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदींना हरवू शकत नाही- राहुल गांधी

(Bihar Election second phase voting completed)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.