Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे… अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने वसवली तीन गावं

भारतीय सॅटेलाईटसनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये ही बाब उघड झाली आहे. | China established three villages on Aruachal Pradesh border

बापरे... अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने वसवली तीन गावं
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 8:39 AM

नवी दिल्ली: लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या खड्या पहाऱ्यामुळे आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यानंतर आता चीनने अरूणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली आहे. चीन सध्या अरूणाचल प्रदेशच्या सीमेवर जोरदार हालचाली करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनने अरूणचालच्या सीमेवर तीन नवी गावे वसवली आहेत. (China established three villages on Aruachal Pradesh border)

भारतीय सॅटेलाईटसनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये ही बाब उघड झाली आहे. चीनने बुम ला दर्रा या परिसरापासून काही अंतरावर तीन गावे वसवली आहेत. या भागात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषा जातात. चीनने ही तिन्ही गावे आपली असल्याचा दावा केला आहे. तसेच या गावांमध्ये चीनकडून जाणीवपूर्व काही लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे आता भारताकडून यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लडाखमध्ये भारतीय जवानांनी उधळून लावला होता घुसखोरीचा प्रयत्न

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चिनी सैन्य पँगाँग सरोवराच्या परिसरात एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. चिनी सैनिकांनी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी पँगाँग सरोवराच्या भागात घुसखोरी केली होती. मात्र, भारतीय जवानांनी त्यांचा हा डाव उधळून लावत उलट चीनच्या ताब्यातील फिंगर 2 आणि फिंगर 3 या टेकड्यांवर कब्जा मिळवला होता. तर 7 सप्टेंबरला चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांना चिथावण्यासाठी हवेत गोळीबार केला होता.

चीन ‘सुपर सोल्जर्स’ची तुकडी उभारणार? सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी बायोलॉजिकल टेस्ट

लडाखसारख्या उंचीवरील आणि दुर्गम प्रदेशात भारताला शह देण्यासाठी आता चीनकडून ‘सुपर सोल्जर्स’ तयार करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी चीनकडून सैनिकांच्या जैविक चाचण्या (biological tests) सुरु असून या माध्यमातून सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवली जाणार आहे.

भारताविरोधात चीनची नवी चाल, ब्रह्मपुत्रा नदीवर ड्रॅगन उभारणार ‘सुपर डॅम’

चीनकडून सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ यारलुंग जंगबो(ब्रह्मपुत्रा ) नदीवर मोठे धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारणीला आगामी काळात सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा भारतीय जल सुरक्षेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये तिबेटी भाषेत यारलुंग जंगबो म्हटलं जाते.

या धरणामुळे भारत आणि बांगलादेशच्या चिंतेत वाढ होऊ शकते. ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून वाहत येऊन भारत आणि बांग्लादेशातून वाहते. चीननं भारत आणि बांग्लादेशवर याचा काही परिणाम होणार नाही, दोन्ही देशांच्या हिताचा विचार केला जाणार असल्याचा दावा केला आहे.

संबंधित बातम्या:

चीनची घुसखोरी थांबेना, मित्र असलेल्या नेपाळमध्येही जमीन लाटली

Special Report | चीनची घुसखोरी नाही, मग जवान का गमावले?- चिदंबरम

मोठी बातमी: पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागे घेण्याची चीनची तयारी, भारताला दिला ‘हा’ प्रस्ताव

(China established three villages on Aruachal Pradesh border)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.