उन्हाळ्यात उष्मघाताच्या सस्येपासून वाचण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी
उन्हाळ्यात लोकांना अनेकदा अॅसिडिटी, गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. डॉक्टरांच्या मते, उष्ण हवामान, पाण्याची कमतरता आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल यामुळे या समस्या निर्माण होतात.

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. आशा ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. उन्हाळ्यात तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण गरजेचे असते. तुमच्या शरीरला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये काही विशेष गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात पोटाच्या समस्या वाढू लागतात. या ऋतूत अनेकांना उलट्या, जुलाब आणि आमांशाचा सामना करावा लागतो. याशिवाय उन्हाळ्यात अनेक प्रकारच्या समस्या सामान्य होतात. आता प्रश्न असा आहे की जर हिवाळ्यात भरपूर खाल्ल्यानंतरही लोक ठीक राहतात, तर उन्हाळ्यात पोटाच्या समस्या का वाढतात? चला डॉक्टरांकडून याचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
अति उष्णता, पाण्याची कमतरता आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींमध्ये बदल यामुळे लोकांना पोटाशी संबंधित समस्या येऊ लागतात. उन्हाळ्याच्या काळात घामाच्या स्वरूपात शरीरातून जास्त पाणी बाहेर पडते, ज्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण होते. पाण्याअभावी पोटात पेटके, बद्धकोष्ठता आणि इतर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात शरीराचे कार्य योग्य राहावे म्हणून शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे.
उन्हाळ्यात मसालेदार अन्न पोटाचे आरोग्य बिघडवू लागते. उन्हाळ्यात जंक फूड आणि फास्ट फूड खाल्ल्याने अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. या ऋतूत पोट निरोगी ठेवण्यासाठी सहज पचणारा आहार घ्यावा. उन्हाळ्यात पोटासाठी लापशी, सॅलड आणि सूप हे रामबाण उपाय असू शकतात. हे पचनास मदत करते आणि पोट निरोगी ठेवते. याशिवाय उन्हाळ्यात बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात. लोकांना पोटात संसर्ग होऊ लागतो, विशेषतः पाणी आणि अन्नाद्वारे. यामुळे पोटदुखी, अतिसार आणि उलट्या होऊ शकतात. अशा परिस्थितीत, अन्न स्वच्छतेची काळजी घ्या. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात पोट निरोगी ठेवण्यासाठी बाहेरील अन्न टाळावे. उन्हाळ्यात पचनसंस्था कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. उन्हाळ्यात पचनसंस्था सक्रिय ठेवण्यासाठी हलका आहार घ्या. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवणार नाहीत.
याशिवाय उन्हाळ्यात मानसिक दबाव आणि ताण यामुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात. मानसिक आरोग्याचा शरीरावर खोलवर परिणाम होतो. जर ताण जास्त वाढला तर त्याचा पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. ताण कमी करण्यासाठी योगासने, ध्यानधारणा आणि हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. तुमच्या शरीरातील हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये फळांचा समावेश करू शकता. फळांमध्ये नैसर्गितरित्या साखर आणि पाणी असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची मात्रा नियंत्रित राहाते. तुमच्या आहारामध्ये फळांच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे तुम्ही निरोगी शरीर ठरू शकता.