Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Almond Benefits | सोलून खावेत की पाण्यात भिजवून? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत

आपल्याला लहानपणापासूनच नेहमी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. पण या व्यतिरिक्तही बदामाचे असे बरेच फायदे आहेत.

Almond Benefits | सोलून खावेत की पाण्यात भिजवून? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत
बदाम
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 12:45 PM

मुंबई : आपल्याला लहानपणापासूनच नेहमी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. पण या व्यतिरिक्तही बदामाचे असे बरेच फायदे आहेत. बदाम शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते, निरोगी चरबी आणि रक्तातील साखर पातळी योग्य ठेवते. बदामांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटामिन ई, कॅल्शियम, जस्त सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण, बदाम सोलून खावेत की न सोलता खायला हवेत, याबद्दल बरेच लोक संभ्रमात असतात (Almond Benefits and know the right way to eat almond for more benefit).

जाणून घ्या बदाम खाण्याचा योग्य मार्ग

बदाम सोलून खावेत की न सोलता खावेत यावर बऱ्याच लोकांचे दुमत असते. बरेच लोक फक्त घाईघाईत सालासकटच बदाम खातात. यामुळे त्यांना बदामाचा पूर्णपणे लाभही मिळत नाही. बदामाचे साल पचायला खूप जड आहे. बदामाच्या सालामध्ये टॅनिन नावाचा एन्झाइम असतो. यामुळे पोषक घटक शरीरात पूर्णपणे शोषले जात नाहीत. म्हणूनच बदाम नेहमी सोलूनच खाल्ले पाहिजेत.

भिजवलेल्या बदामांचे फायदे

बदाम सालासकट खाणे तसेही थोडे त्रासदायक असते. त्याच वेळी, बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात. रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते. फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास कॅल्शियम, झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते. म्हणूनच, भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो (Almond Benefits and know the right way to eat almond for more benefit).

एका दिवसात किती बदाम खावेत?

  1. रात्री 3 ते 4 बदाम भिजवा. सकाळी ही बदाम सोलून तुम्ही खाऊ शकता. हे बदाम आपल्याला त्वरित ऊर्जा देतील, जी सकाळी अधिक महत्वाची आहे.
  2. सकाळचा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी आपण ओट्स, स्मूदी आणि शेकमध्ये बदाम वापरू शकता.
  3. न्याहरीसाठी आपण बदाम मनुका, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया भिजवून खाऊ शकता.
  4. बर्फी, लाडू, कुकीज, ग्रॅनोला बार आणि क्लासिक हलवा यासारख्या घरी बनवलेल्या मिठाईंमध्येही बदामांचा वापर केला जाऊ शकतो.
  5. एका दिवसात 6 ते 8 बदामांपेक्षा जास्त बदाम सेवन करू नयेत, यामुळे वजन वाढू शकते आणि शरीराची उष्णता देखील वाढू शकते.
  6. आपण दररोज 3 ते 4 बदामाचे सहज सेवन करू शकता.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Almond Benefits and know the right way to eat almond for more benefit)

हेही वाचा :

Ayurveda fruits Rules : फळांचे सेवन करताय? मग, आधी आयुर्वेदाने सांगितलेले ‘हे’ नियम जाणून घ्या!

Home Remedies | ‘डार्क अंडर आर्म्स’च्या समस्येतून मुक्ती हवीय? मग, ‘या’ सोप्या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.