Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघात तिसरा नकोय? मग या गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर…

लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पे आहे. या लेखात आपण लग्नजीवनात विश्वासघाताचे कारणे आणि त्यावर मात कशी करावी हे पाहू. जोडीदाराच्या चुका शांततेने समजावून घेणे, त्यांची मदत करणे, त्यांच्याबरोबर उभे राहणे आणि समस्या शांततेने सोडवण्याचे मार्ग यावर भर दिला जाईल. विश्वास, आदर आणि संवाद हे एक मजबूत नातं निर्माण करण्याच्या मुलाधार आहेत.

दोघात तिसरा नकोय? मग या गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर...
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 1:47 PM

लग्न ही एक माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नापासून त्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होते. लग्न म्हणजे केवळ एक नातं नाही, तर सहजीवनाचं एक बंधनही आहे. लग्न झाल्यानंतर दाम्पत्य एकमेकांना समजून घेत असतात. न सांगता एकमेकांची काळजी घेत असतात. एकमेकांच्या गरजा लक्षात घेत असतात. आदर राखणं हा देखील त्यामागचा एक पर्याय आहे. म्हणूनच लग्न या घटकाला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. लग्नाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. विश्वासावर अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळेच दोघांनीही एकमेकांना साथ द्यायची असते. एकमेकांना दगा द्यायचा नसतो.

लग्नानंतर आपण अनेकांचे विवाहबाह्य संबंध झाल्याचेही ऐकतो. दोघांमध्ये तिसरा किंवा तिसरी येत असते. त्यामुळे प्रकरण हाताबाहेर जातं. घटस्फोटापर्यंत येतं. संसार उद्ध्वस्त होतो. अशावेळी दोघांनीही सामंजस्याने राहिलं पाहिजे. दोघांनीही एक पाऊल मागे टाकून दोन पावलं पुढे टाकले पाहिजे. नात्यातील विश्वास घट्ट ठेवून तिसरी व्यक्ती आयुष्यात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जर तुमच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येऊ द्यायची नसेल तर काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

जोडीदाराच्या चुका समजावून द्या

हे सुद्धा वाचा

तुमच्या जोडीदाराला त्याच्या चुका सांगणे आणि त्याला समजून घेणे या गोष्टी नात्याला बळकट करतात. जोडीदाराचे संरक्षण करण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीच्या गोष्टी नीट ऐका. तुमच्या जोडीदाराला विश्वासात घेऊन एकांतात त्याच्या चुका समजावून द्या आणि त्याला चूक आणि बरोबर याची माहिती द्या. दुसऱ्यांसमोर जोडीदारावर आरोप करणे, केवळ त्याचा अपमान करणे, यामुळे तुमच्या नात्यावर देखील परिणाम होतो.

जोडीदाराची मदत घ्या

नात्यात काही मर्यादा ठेवल्या पाहिजे. जोडीदाराचा वारंवार अपमान करू नका. इतरांसमोर कमीपणा येईल असं बोलू नका. दोघांनी आपआपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे. नात्यातील एक पुसटशी सीमारेषा असते, ती पाळली पाहिजे. तिचं उल्लंघन होता कामा नये. तुमचे सर्व निर्णय आणि योजना फक्त तुमच्या जोडीदाराच्या मदतीने पूर्ण करा. यामुळे तुमच्या दोघांच्या मनात प्रेम, सहानुभूती आणि आदर निर्माण होईल.

जोड़ीदारासोबत राहा

उघडपणे जोडीदाराच्या बाजूने उभे राहताना त्याच्या चुका त्याला खासगीत सांगा. दुसऱ्यांच्यासमोर त्यांना ओरडू नका, त्यांना कमीपणा वाटेल असं काही करू नका. तुमच्या नात्यात गोडवा कसा टिकून राहील याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराव जर कोणी खोटा आरोप करत असेल, तर त्या वेळी तुमच्या जोडीदाराच्या बाजूने उभे राहा. तुमच्या मनात शंका वाढवू देऊ नका.

शांततेत मार्ग काढा

समस्या समजून घेण्यासोबतच शांतपणे तिला सोडवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पक्षांना शांततेत ऐकून, तुमच्या जोडीदाराला समजून घेतल्यावर त्याला क्लिष्ट परिस्थितीमधून बाहेर काढा. तुमच्या जोडीदारापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याच्याशी प्रामाणिक राहा. तुमच्या जोडीदाराला हे जाणवून द्या की तुम्ही प्रत्येक क्षणी त्याच्यासोबत आहात. यामुळे जीवनातील समस्या आणि द्विधा परिस्थिती सोडवण्यात मदत मिळते.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.