Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरावर परिणाम होतो? जाणून घेऊया

कांदा ही अशीच एक गोष्ट आहे, जी प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात आढळते. त्याशिवाय, काहीही चवदार वाटत नाही. काही लोकांना उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याची आवड असते. अशा परिस्थितीत, दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात ते जाणून घेऊया.

दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरावर परिणाम होतो? जाणून घेऊया
Raw OnionImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Mar 22, 2025 | 12:46 PM

साधारणपणे प्रत्येक स्वंयपाकघरात जेवण बनवताना कांद्याचा वापर केला जातो. कारण कांद्याशिवाय कोणतीही भाजी किंवा कोणताही पदार्थ चांगला लागत नाही. त्यात असे काही लोकं आहेत ज्यांना कांदा खायला आवडतो तर काही लोक ते खाणे टाळतात. पण आरोग्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कांदा केवळ चव वाढवत नाही तर पोषक तत्वांनीही समृद्ध असतो. दुपारच्या जेवणात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

यावेळी आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल सांगतात की, कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट्ससारखे घटक देखील आढळतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कांदा सॅलड म्हणून खाल्ला तर शरीराला अनेक प्रकारे फायदे मिळतात. चला तर मग कच्चा कांदा आरोग्यासाठी कसा फायदेशीर ठरतो ते तज्ञांकडून जाणून घेऊया…

योग्य पचन होते

उन्हाळ्यात अनेकांना गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या अनेकदा उद्भवू शकतात.यासाठी तुमच्या आहारात कच्चा कांद्याचा समावेश करा, कारण कच्चा कांदा पचनक्रिया सुधारतो. त्यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पोट स्वच्छ करते. तसेच पोटाला कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरियाच्या संसर्गापासून वाचवते आणि पचनसंस्था मजबूत करते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल

कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. यासोबतच, ते शरीराचे विषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण करते. अशा परिस्थितीत तुमच्या आहारातील सॅलडमध्ये कच्चा कांदा नक्कीच समाविष्ट करा.

त्वचेसाठी फायदेशीर

कांद्यामध्ये सल्फर आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेसाठी फायदेशीर असते. हे त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते आणि मुरुम येण्यापासून रोखते. अशातच उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि प्रदूषणामुळे त्वचेच्या समस्या निर्माण झाल्यास कच्चा कांदा त्वचेला दुरुस्त करतो.

मधुमेह

कच्चा कांदा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यात क्रोमियमसह इतर घटक असतात, जे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते, कारण ते इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते. अशा परिस्थितीत, तुम्ही आतापासून तुमच्या आहारात कच्चा कांदा नक्कीच खाण्यास सुरुवात करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.