Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटाची चरबी होईल कमी, ‘या’ मसाल्यांचे पाणी पिताच मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

स्वयंपाकघरात जेवणात वापरले जाणारे मसाले केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर ते तुमच्या आरोग्याचीही काळजी घेतात. काही मसाले असे आहेत ज्यांचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

पोटाची चरबी होईल कमी, 'या' मसाल्यांचे पाणी पिताच मिळतील हे आश्चर्यकारक फायदे
SpicesImage Credit source: Tv9 Network
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 8:03 PM

आपल्या भारतीय घराघरांमध्ये मसालेदार जेवण खुप आवडीने सेवन करत असतात. प्रत्येक शहरात, गावात, राज्यात तुम्हाला एक अनोखी चव आणि पांरपारिक पदार्थ पाहायला मिळेल. कारण या सर्वांमध्ये जर काही सौम्य असेल तर ते मसाले आहेत. स्वयंपाक करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी प्रत्येक जेवणात वापरले जाणारे बहुतेक मसाले सारखेच असतात. काळी मिरीपासून ते लवंग तसेच प्रत्येक मसल्यात स्वत:चे औषधी गुणधर्म असतात. वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढवणे महत्वाचे आहे. त्यामुळे काही मसाल्यांचे पाणी तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतात. .

तुमचे वजन जास्त वाढत असेल तर तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच, केवळ तंदुरुस्त राहण्यासाठीच नव्हे तर निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रित करणे देखील महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यास कोणत्या मसाल्याचे पाणी शरीरासाठी उपयुक्त आहे ते आपण आजच्या लेखात जाणुन घेऊयात…

जिरे पाणी प्या

तुम्हाला जर तुमचे वाढते वजन कमी करायचे असल्यास सकाळी उठल्यानंतर जिऱ्याचे पाणी पिणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. ग्लॅमरस आणि फिट राहण्यासाठी सुद्धा तुम्ही जिरे पाणीचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही अर्धा चमचा जिरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते उकळवा, गाळून घ्या आणि कोमट प्या.

मेथीच्या दाण्यांचे पाणी

सकाळी उठल्यानंतर मेथीच्या दाण्यांचे पाणी पिणे वजन कमी करण्यास देखील मदत करते आणि मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि त्वचा देखील चमकदार होते.

दालचिनीचे पाणी

वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही दालचिनी चहा दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. दालचिनी पाण्यात चांगले उकळा आणि घोट घोट करून प्या. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.

बडीशेप पाणी

उन्हाळ्यात वजन नियंत्रित करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे. हे तुमचे पचन निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. ज्यांना बद्धकोष्ठता, आम्लपित्त किंवा सकाळी आजारपणाची समस्या आहे त्यांच्यासाठीही बडीशेप पाणी फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....