रिलेशनशीपमध्ये येताच तरुणींमध्ये होतो हा बदल; मुलं का वैतागतात?
प्रेम कर भिल्लासारखं... असं म्हटलं जातं. जेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा तो असाच आकंठ बुडून जातो. अनेक लोक तर प्रेमात तहानभूक विसरून जातात. एकतर्फी प्रेम करणारे तर कायम प्रेमात झुरत असतात. पण ज्या मुली पहिल्यांदा प्रेमात पडतात तेव्हा त्यांचं आयुष्य ऐंशी कोनात बदलून जातं. स्वभावापासून ते वागण्याबोलण्यात मोठा बदल होतो.
एखादी व्यक्ती प्रेमात पडल्यानंतर त्याचं जग बदलतं. प्रेमात एवढी प्रचंड ताकद असते. जी लोकं प्रेमात पडलेली असतात त्यांचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट जाणवते. त्यांचं वागणं, बोलणं आणि राहणीमान सर्व काही बदललेलं असतं. ही लोक स्वप्नांच्या दुनियेत फिरत असतात. प्रेमाची नशा त्यांच्यावर झालेली असतात. एखादा वाम मार्गाला लागलेला तरुण जर प्रेमात पडला तर तो चांगल्या मार्गावर येतो. प्रेमात तेवढी ताकद असते. ही मंडळी प्रेमासाठी जीव द्यायलाही तयार असतात. वाटेल ते करतात. प्रेमात पडल्यावर मुलांच्याच नव्हे तर मुलींच्याही आयुष्यात बदल होतो. त्यांचाही स्वभाव बदलतो. कोणता कोणता बदल होतो मुलींमध्ये त्यावर टाकलेला हा प्रकाश.
रिलेशनशीपमध्ये आल्यावर मुलींमध्ये काय बदल होतो?
1 . वागण्यात बदल
मुली जेव्हा रिलेशनशीपमध्ये येतात तेव्हा अचानक त्यांच्या वागण्यात बदल होतो. काही मुली रिलेशनशीपमध्ये आल्यावर अधिकच समजदार होतात. त्या प्रत्येक गोष्टीला त्या सकारात्मक पद्धतीने घेतात. पण काही मुली भावनिकदृष्ट्या खूप बदललेल्या असतात. अशावेळी मुलं मात्र प्रचंड वैतागतात. मुलींची ही भावनिक अटॅचमेंट त्यांना त्रासदायक वाटू लागते. त्यांना इरिटेट झाल्यासारखं होतं.
2 . लवकर झोप न लागणे
रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर तरुणींमध्ये केवळ भावनिक नव्हे तर मानसिक आणि शारिरीक पातळीवरही बदल होतात. त्यांची झोप उडते. त्या जेव्हा झोपण्यासाठी बेडवर जातात तेव्हा त्यांना जुन्या आठवणी सतावू लागतात. दिवसभरातील आठवणी डोळ्यांसमोर रुंजी घालू लागतात. तसेच भविष्याच्या कल्पना त्यांच्या डोळ्यांसमोर आशेची पंख लावून थुई थुई नाचत असतात. त्यामुळे त्या बेडवर पडता पडताच स्वप्न रंगवू लागतात. परिणामी त्यांना लवकर झोप लागत नाही.
3 . सुंदर दिसण्यावर अधिक लक्ष
जेव्हा मुली प्रेमात पडतात तेव्हा त्या आपल्या शरीरावर अधिक लक्ष देतात. सुंदर दिसण्यावर त्यांचा अधिक कल असतो. त्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करत असतात. पार्लरमध्ये जातात. अनेकदा तर त्या आपल्या बॉयफ्रेंडला जबरदस्तीने पार्लरमध्ये घेऊन जातात. त्यामुळेच मुलांचे खिसे रिकामे होतात. त्यामुळेही मुले वैतागतात. जेव्हा मुली सिंगल असतात तेव्हा त्या आपल्याकडे फार वेळ देत नाहीत. पण रिलेशनशीपमध्ये येताच त्या बदलून जातात.
4 . मित्रांपेक्षा प्रियकरावर अधिक लक्ष
मुली जेव्हा रिलेशनशीपमध्ये येतात तेव्हा त्या अधिक खूश होतात. त्या प्रियकरासोबत अधिक वेळ घालवू इच्छितात. अशावेळी त्यांचे मित्र त्यांच्याशी बोलत नसतील तर त्यांना काही फरक पडत नाही. विशेष म्हणजे त्याच मित्र आणि मैत्रिणीशी बोलणं टाळतात. त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त बॉयफ्रेंडकडे असतं. बॉयफ्रेंडच्याच टचमध्ये राहणं त्यांना आवडतं. पण मुलींचा हा चिपकू स्वभाव मुलांना आवडत नाही. मुलींच्या या अटॅचमेंटमुळे मुले परेशान होतात.