Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील असं एक हिल स्टेशन जिथे जाताच तुम्ही महाबळेश्वर, माथेरानला विसरून जाल

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात एक असे ठिकाण आहे ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. तुम्ही जर या ठिकाणी गेल्यावर इथलं नैसर्गिक सौंदर्य बघून तुमचं मन हरपून जाईल.

महाराष्ट्रातील असं एक हिल स्टेशन जिथे जाताच तुम्ही महाबळेश्वर, माथेरानला विसरून जाल
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 6:30 PM

आपल्यातील अनेकांना जग भ्रमंती करायला खूप आवडते. अशी लोकं जगाच्या पाठीवर कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन निसर्गाचा आनंद लुटतात. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात देखील अशी काही ठिकाणं आहेत जिथे जाऊन तुम्हाला प्रसन्नता वाटेल आणि तुमच्या मनाला आनंद वाटेल. तर

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात एक असे ठिकाण आहे ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. तुम्ही जर या ठिकाणी गेल्यावर इथलं नैसर्गिक सौंदर्य बघून तुमचं मन हरपून जाईल. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरायला आवडणाऱ्या लोकांना शहरांमध्ये लपलेली सुंदर ठिकाणे पाहणे आणि नवीन ठिकाणे शोधणे आवडते.

अशा लोकांना ही जागा स्वर्गासारखी वाटणार आहे. हे असे ठिकाण आहे जिथे आपल्याला हवामान थंड वाटेल. निसर्गाच्या सान्निध्यात हे ठिकाण शांत आणि बजेटफ्रेंडली आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला या ठिकाणाची सविस्तर माहिती देणार आहोत. जर तुम्ही आजच्या आधी इथे आला नसाल तर तुम्हाला खरोखरच ही जागा नंदनवन वाटणार आहे.

तोरणमाळ हिल स्टेशन

ट्रेकिंग आणि कॅम्पिंग करणाऱ्या लोकांनाही हे हिल स्टेशन आवडेल. ट्रेक करायचा असेल तर सीताखाई ट्रेलवर ट्रेक करू शकता. मच्छिंद्रनाथ महाराजांची गुहा देखील येथे आहे. ही नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा आहे. ही गुहा मच्छिंद्रनाथांचे ध्यानस्थान मानली जाते. हे महाराज एक महान तपस्वी होते. तसेच त्यांना माशांचा स्वामी म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय तोरणमाळमधील महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाणारे गोरखनाथ मंदिर देखील आहे.

यशवंत तलाव आणि लोटस तलाव

तोरणमाळ हिल स्टेशनचे सर्वात खास तलाव म्हणजे यशवंत तलाव आणि लोटस तलाव. हे तलाव तोरणमाळ हिलचे खास नैसर्गिक आकर्षणासाठी ओळखले जाते. लोटस लेकमध्ये तुम्हाला अनेक कमळाची फुले एकत्र पाहायला मिळतील. याशिवाय तोरणमाळ हिल स्टेशन हिरव्यागार झाडांनी आणि जंगलांनी वेढलेले आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींना हे ठिकाण अधिक आवडते. नंदुरबारमधील प्रेक्षणीय ठिकाणांपैकी हे एक स्थळ आहे.

कसे पोहोचायचे?

तुम्हाला देखील आता नंदुरबारच्या तोरणमाळ येथे जाण्याची उत्सुकता लागलीच असेल. तोरणमाळ मुंबईपासून सुमारे ४६५ किमी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करू शकतात. यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावर उतरल्यावर तुम्ही बस किंवा कॅबने तोरणमाळ हिल स्टेशनपर्यंत पोहोचू शकता.

तोरणमाळसाठी महाराष्ट्रातील इतर शहरांतूनही बसेस उपलब्ध आहेत, मात्र त्यासाठी वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही थेट बसनेही प्रवास सुरू करू शकता.

जर तुम्ही तुमच्या कारने प्रवास करत असाल तर तुम्हाला जास्त वेळ घालवावा लागेल तसेच एवढ्या लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागेल. ट्रेनने तुम्ही फक्त ६०० ते ७०० रुपयांत सहज पोहोचू शकता, तर कारने येताना एकतर्फी पेट्रोल आणि टोल चा खर्च जोडून २०००रुपयांपर्यंत जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला देखील या निसर्गाने वेढलेल्या व नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातील एक चांगले ठिकाण आहे.

अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा
अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा.
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं.
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.