Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Relationship Survey : रिलेनशीप,लग्नाविषयी भारतीय स्त्रियांचे विचार काय? निष्कर्ष असे की, तुम्हाला ही बसेल धक्का

Relationship Survey : लग्न आणि रिलेशनशीपविषयी भारतीय स्त्रियांचे विचार काय? निष्कर्ष ऐकून बसेल धक्का

Relationship Survey : रिलेनशीप,लग्नाविषयी भारतीय स्त्रियांचे विचार काय? निष्कर्ष असे की, तुम्हाला ही बसेल धक्का
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 8:41 PM

नवी दिल्ली : लग्न आणि रिलेशनशीप (Marriage And Relationship) सारख्या प्रकरणात प्रत्येक व्यक्ती फार गांभीर्याने विचार करतो. त्यानंतरच तो योग्य ते पाऊल टाकतो. भारतीय समाजात (Indian Society) लग्न हा संस्कार आणि पवित्र बंधन मानण्यात येते. परंतु, आता काळानुसार त्यात बदल दिसून येत आहे. आता अनेक तरुण-तरुणी लग्नापूर्वी भेटीगाठी घेतात. एकमेकांना वेळ देतात. समजून घेतात आणि नंतर पुढचा निर्णय घेतात. तर काही ठिकाणी अजूनही लग्नापूर्वी तरुण-तरुणीच्या भेटीला योग्य मानण्यात येत नाही. भारतीय परंपरेत या गोष्टींकडे पाहण्याचा कर्मठ दृष्टिकोन आहे.

लग्न आणि रिलेशनशीपविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. काही परंपरा आणि कर्मठ विचार आहेत. लग्न आणि रिलेशनशीपविषयी एक सर्व्हेक्षण करण्यात आले. सर्व्हेक्षणातील आकडेवारीवर नजर टाकली असता, त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते.

या डिजिटल युगात जीवनसाथी निवडीसाठीही आता डिजिटल माध्यमांचाच वापर होत आहे. अनेकजण लग्नाविषयीचे अॅप्स, साईटचा अथवा सोशल डेटिंग साईटचा आधार घेत आहेत. यामधील एक डेटिंग अॅप बंबलने हा सर्वे पूर्ण केला. बंबलच्या आकडेवारीने अनेकांना धक्का बसला.

हे सुद्धा वाचा

डेटिंग अॅपचा वापर करणाऱ्या जवळपास 39 टक्के लोकांना वाटते की, त्यांचे कुटुंबिय लग्न सराईत त्यांना लग्न करण्याची वा एखाद्या रिलेशनशीपमध्ये अडकण्याचा सल्ला देतात. या अॅपचा वापर करणाऱ्या जवळपास 33% अविवाहित तरुण-तरुणींना वाटते की, त्यांना लग्नासाठी बळीचा बकरा बनविल्या जात आहे. त्यांच्यावर दबाव आहे.

डेटिंग अॅप बंबलच्या आकडेवारीनुसार, भारतातील जवळपास 81 टक्के महिला लग्न न करताच खूश आहेत. त्यांना एकटे राहण्यात जास्त चांगले वाटते. या सर्वेत जवळपास 83 टक्के महिलांनी भावना व्यक्त केली की, त्यांना जोपर्यंत योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत त्या कोणत्याही नात्यात अडकू इच्छित नाही.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.