Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमधील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट; शिंदे-फडणवीस सराकारने काढला GR

ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघामधील दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी वाकळण बामाली, नारिवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशिव व गोठेघर या 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करावा अशी स्थानिकांची मागणी होती.

कल्याणमधील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट; शिंदे-फडणवीस सराकारने काढला GR
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 12:34 AM

मुंबई : ठाणे जिल्हयातील कल्याण ग्रामीण महानगरपालिकेलगतच्या 14 गावांना (14 Villages) नवी मुंबई महानगरपालिकेत( Navi Mumbai Municipal Corporation) समाविष्ट करण्याच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सराकारने मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने (Urban Development Department)या संदर्भातील शासन आदेश (GR) जारी केला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी 20 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघामधील दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी वाकळण बामाली, नारिवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशिव व गोठेघर या 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करावा अशी स्थानिकांची मागणी होती.

यासाठी स्थानिक भूमीपूत्र व रहिवाशांच्या मागणीनुसार विविध माध्यमातून सतत पाठपुरावा सुरु होता. या संदर्भात राजू पाटील यांनी 24 मार्च 2022 रोजी सभागृहात लक्षवेधी मांडली होती.

या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या गावांचा तातडीने नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात येईल व महानगरपालिकेकडून सर्व सोयी-सुविधा देण्यात येतील असे आश्वासन दिले होते.

या आश्वासनाला पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. राजू पाटील यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित होता.

यानंतर 20 ऑगस्ट रोजी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजी पाटील यांनी पत्रव्यवहार केला होता. माहिती घेऊन या गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती.

त्यानुसार 12 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाने या संदर्भातील जीआर काढला आहे.

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.