Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काल पौर्णिमा होती काही लोकं…’, शाह, शिंदे भेटीवर आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे.

'काल पौर्णिमा होती काही लोकं...', शाह, शिंदे भेटीवर आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
aaditya thackeray
Follow us
| Updated on: Apr 13, 2025 | 3:11 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी शिंदे यांचं नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. मुंबईतील पाणी प्रश्नावर आज शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली, या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईमध्ये होते, त्यांची भेट एकनाथ शिंदेंनी घेतली. मात्र त्यांनी अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केली आहे. अर्थ खातं आमच्या फाईलवर सही करत नाही, अशी तक्रार त्यांनी शाह यांच्याकडे केली, तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा देखील त्यांनी या भेटीवेळी उपस्थित केला अशी माहिती समोर येत आहे, असं यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं.  या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता खोचक टेला लगावला आहे. ‘ काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील, आणि मग ते ज्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, आमच्या अनुभवावरून सांगतो. बाकी काही नाही.’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  आज आम्ही सगळे शिवसेनेचे जे मुंबईतील स्थानिक नेते आहोत,  उपनेते आहेत,  विभागप्रमुख, पदाधिकारी, महिलाआघाडी सर्वांची बैठक झाली. एकंदर आपण पाहात आहात गेल्या साहा-सात महिन्यांपासून मुंबईतील पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला आहे, मग कुठं गढूळ पाणी असेल, कुठं पाण्याचा दाब कमी असेल. आणि आता उन्हाळ्यात टँकर असोसियशनने संप पुकारला आहे. आता मुद्दा हा आहे की संपापूर्वी टँकर असोसियशनने नोटीस देऊन सुद्धा सरकार काही हलल नाही. मुंबईत महापालिकेतील जे प्रशासक आहेत, ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरच चालतात. मुंबईची एवढी आर्थिक हत्या होत आहे, तरी देखील मुख्यमंत्री लक्ष  देत नाहीये, या पेक्षा अजून मोठं दुर्दैव कोणतं असेल?

मी या संपावर तोडगा काढण्यासाठी 48 तासांची डेडलाईन दिली होती, ती आता संपत आली आहे. या आठवड्यात प्रत्येक वार्डस् मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी वार्ड ऑफिसरवर मोर्चा काढून, पाण्यासंदर्भात प्रश्न विचारणार आहेत, असा इशाराही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.