अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीचं समन्स, नेमकं प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीने समन्स बजावलं आहे. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीचं समन्स, नेमकं प्रकरण काय?
अजित पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 5:11 PM

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी राजेंद्र घाडगे यांना समन्स बजावण्यात आलं आहे. राजेंद्र घाडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आहेत. कारखान्याशी संबंधित राजेंद्र घाडगे यांची चौकशी सुरु आहे. हे प्रकरण बंद होण्याच्या टप्प्यामध्ये असल्याने घाडगे यांना समन्स बजावण्यात आलं आहे. राजेंद्र घाडगे यांना जुन्याच प्रकरणात एसीबीकडून चौकशीचं समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एसीबीकडून जरंडेश्वर साखर कारखान्याची काही नव्याने चौकशी केली जात नाहीय. एसीबीकडे हे प्रकरण प्रलंबित आहे आणि जुनं प्रकरण आहे. या प्रकरणात अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीने चौकशीला बोलावालेलं होतं आणि 21 तारखेला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रक्रियेचा भाग म्हणून एसीबीकडून घाडगे यांची चौकशी केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

राजेंद्र घाडगे हे जरंडेश्वर साखर कारखान्यावर डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. राजेंद्र घाडगे यांना 17 तारखेला समन्स बजावण्यात आलं होतं आणि 21 तारखेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. जरंडेश्वर साखर कारखान्याची नव्याने चौकशी केली जात नसल्याचं स्पष्टीकरण एसीबी अधिकाऱ्यांनी दिलं होतं. त्यानंतर प्रक्रियाचा भाग म्हणून राजेंद्र घाटगे यांची चौकशी केली जात आहे. प्रलंबित असलेलं हे प्रकरण आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सगळा अहवाल तयार करण्यासाठी प्रक्रियेचा भाग म्हणून चौकशी केली जात आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची नव्याने चौकशी केली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.