‘घरात जास्त पैसा झाला की…’; पुणे अपघातावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

पुणे अपघात प्रकरण चर्चेत असताना यावर आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पब किंवा डान्सबारमध्ये प्रचंड पैसा असणारा वर्ग जात असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

'घरात जास्त पैसा झाला की...'; पुणे अपघातावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 8:53 PM

पुणे अपघात प्रकरणाची चर्चा देशभरात होत असलेली पाहायला मिळत आहे. कल्याणीनगर येथे शनिवारी रात्री पबमध्ये पार्टी करून एका बड्या बिल्डरच्या मुलाने दोन तरूण-तरूणींना उडवलं होतं. हा अपघात इतका भीषण होती की धडकेमध्ये तरूण-तरूणी मृत्यूमुखी पडले. आरोपी अल्पवयीन असून बाल हक्क मंडळाने त्याची रवानगी बालसुधार गृहात केलीये. आता पोलीस या प्रकरणात पब मालक आणि मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांची चौकशी करत आहेत. अशातच या प्रकरणावर आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

डान्सबार पब सारखे प्रकार बघितले तर त्यात जाणारा वर्ग प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरली आहे. बंधन कशी येणार कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काहीच पडलं नाही. पैशाच्या भरोशावर लोकशाही घेतली जात असेल, मत खेचली जात असेल तर सामान्य माणसाच्या जीवनाला अनेक त्याच्या मरणाला काही अर्थ नाही. ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आणि ज्याचे श्रम जास्त त्याला पगार कमी आहे अशी परिस्थिती असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात पोलीस व्यवस्थेवरही बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झालेत. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पैसे खाल्याचा आरोप केला होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयातूनच पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली होती.

दरम्यान, आज शुक्रवारी कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे पोलीस खात्यामधील दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. अपघात झाल्यानंतर कंट्रोल रूम शी संपर्क नाही केला. तसेच नाईट राऊंडचे पोलीस उपायुक्त यांना माहिती न दिल्यामुळे पुणे पोलिसांची ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.