Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | चला महापालिकेला 250 कोटींचे Loan मिळाले, आता Smart city च्या कामांना आणखी वेग येणार!

महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे.

Aurangabad | चला महापालिकेला 250 कोटींचे Loan मिळाले, आता Smart city च्या कामांना आणखी वेग येणार!
औरंगाबाद महापालिकेला 250 कोटींचे कर्ज मिळाले. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 1:37 PM

औरंगाबादः शहरवासियांसाठी आणि एकूणच शहरात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठी महत्त्वाची बातमी आहे. औरंगाबाद महापालिकेचे (Aurangabad municipal corporation) 250 रुपयांचे कर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मंजूर केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी (Smart city) प्रकल्पांसाठी महापालिका जो वाटा भरणार होती, त्यासाठीचा निधी महापालिकेकडे येईल. महापालिकेचा स्मार्ट सिटीसाठीचा 182 कोटी रुपयांचा वाटा शिल्लक होता. आता लवकरच तो भरला जाईल. तसेच स्मार्ट सिटीतून प्रस्तावित उर्वरीत कामे आता मार्गी लागतील, असे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी सांगितले. महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे.

स्मार्ट सिटीत कुणा-कुणाचा हिस्सा?

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत एकूण एक हजार कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात केंद्र शासनाचे 500 कोटी तर राज्य सरकार आणि महापालिकेचा वाटा प्रत्येकी 250 कोटी रुपयांचा आहे. त्यानुसार, केंद्र शासनाने आतापर्यंत 294 कोटी रुपये दिले आहेत. तर राज्य शासनाने 147 कोटी रुपये दिले आहेत. यानंतर महापालिकेला 250 कोटी रुपयांचा हिस्सा भरायचा होता. महापालिकेने फक्त 68 कोटी रुपये भरले होते. उर्वरीत 182 कोटींचा हिस्सा भरणे बाकी आहे. केंद्र व राज्य सरकारकडून 309 कोटी रुपयांचा हिस्सा आणखी मिळणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील आठवड्यात राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिकेला 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर 250 कोटी रुपयांचे कर्ज बुधवारी मंजूर झाले. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे आता 491 कोटी रुपयांचा निधी राहणार आहे.

कर्ज मंजूर, पुढे काय?

महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून त्यांच्या निधीचा हिस्सा मिळेल. त्यानंतर स्मार्ट हेल्थ, स्मार्ट एज्युकेशन, संत तुकाराम सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण, सफारी पार्कचे पुढील बांधकाम अशी कामे प्रस्तावित आहेत.

इतर बातम्या-

Nashik | रुग्णालयात घुसून डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण, नाशिकमधील घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik | सटाणा न्यायालयाला नवीन इमारत मिळणार; 10 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर, काय असतील सोयी-सुविधा?

खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.