Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यापीठ नामविस्ताराची 17 वर्षे पूर्ण; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, शहिदांना अभिवादन

14 जानेवारी 1994 रोजी शरद पवार हे मुख्यमंत्री पदी असताना औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या दिवसाला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत.

विद्यापीठ नामविस्ताराची 17 वर्षे पूर्ण; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, शहिदांना अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 11:08 AM

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 28 वा नामविस्तार दिन आहे. 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव बदलण्यात आले. या नामविस्ताराच्या लढ्यात शहीद झालेल्यांचे स्मारक उभारण्याची योजना असून स्मारकाचे भूमीपूजन आज सकाळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (Dr. Pramod Yewle) यांच्या हस्ते करण्यात आले. आज विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

BAMU, Aurangabad

विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातील शहीद स्मारकाचे भूमीपूजन

कुलगुरुंच्या हस्ते भूमीपूजन

14 जानेवारी रोजी शहीद स्मारकाचे उद्घाटन करण्याचे कुलगुरूंनी जाहीर केले होते. मात्र जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी कोरोना नियमावलीअंतर्गत या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे कार्यक्रम घ्यावा की नाही, अशी द्विधा मनःस्थिती कुलगुरुंसमोर झाली होती. मात्र आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनीही कुलगुरुंच्या दालन गाठून हा कार्यक्रम झालाच पाहिजे, असा आग्रह धरला. अखेर आज शुक्रवारी सकाळी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नामविस्तार लढ्यातील शहीदांच्या स्मारकाचे भूमीपूजन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते पार पडले.

नामांतराच्या लढ्याला 17 वर्षे पूर्ण

औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्यासाठी तब्बल17 वर्षांचा लढा द्यावा लागला. 1978 मध्ये या नामांतर लढ्याला सुरुवात झाली. यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना तुरुंगात जावे लागले. ज्या मराठवाड्यात बाबासाहेबांमुळे गोरगरिबांना शिक्षण मिळतेय, त्यांचे नाव विद्यापीठाला द्यायला हवं, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर 14 जानेवारी 1994 रोजी शरद पवार हे मुख्यमंत्री पदी असताना विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या दिवसाला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत.

इतर बातम्या-

shakambhari navratri 2022 | आस्था, श्रद्धेचा शाकंभरी नवरात्र उत्सव, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जल्लोषात जागर

चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; संजय राऊतांनाच खोचक टोला

विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ
विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ.
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.