Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert | थंडी पळाली समजू नका, पुढचे दोन दिवस तापमान घसरण्याची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?

उत्तरेकडील वाऱ्याचा जोर कमी होत आहे. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उत्तरेकडील वाऱ्यांचा परिणाम जाणवत असल्याने तेथे थंडी आहे. परंतु, पुढे दोन दिवसांत सर्वत्र किमान तापमानात संथ गतीने वाढ होणार आहे.

Weather Alert | थंडी पळाली समजू नका, पुढचे दोन दिवस तापमान घसरण्याची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 9:48 AM

औरंगाबादः औरंगाबादसह मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा (Cold wave decreased) जोर कमी झाला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अनेक भागातील तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा खाली घसरला होता. मात्र सध्या किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागतेय की काय असे चित्र आहे. मात्र पुढचे दोन दिवस मराठवाड्यातील (Weather in next 2 days) काही भागातील तापमान एक ते दोन अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी (Meterologist ) वर्तवली आहे. त्यानंतर किमान तापमानात हळू हळू वाढ होईल, मात्र 19 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यताच वर्तवली जात आहे.

सध्या मराठवाड्यातील तापमान कसे?

औरंगाबाद- किमान 13.6, कमाल- 31.4 परभणी- किमान 14.0, कमाल- 32.6 नांदेड- किमान 19.0, कमाल- 32.6 बीड- किमान- 13.0, कमाल 29.0 उस्मानाबाद- किमान- 14.0, कमाल- 32.3 हिंगोली- किमान – 18.0, कमाल- 31.0

उत्तर मराठवाड्यात पारा घसरणार

सध्या किमान आणि कमाल तापमानात काहीशी वाढ झालेली असली तरीही पुढील दोन दिवस उत्तर मराठवाड्यात म्हणजे परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यात आहे. त्यानंतर किमान तापमानात हळू हळू 2 ते 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच विस्तारीत अंदाजानुसार (ERFS) मराठवाड्यात 13 ते 19 फेब्रुवारीदरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता, मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.

राज्याची सद्यस्थिती काय?

भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रत्र कृष्णानंद होसळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, रा्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे 10 अंश एवढे नोंद झाले असून मुंबईदेखील 17 अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. राज्यातील किमान तापमानात पुन्हा एकदा किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान थोडे खाली आहे. तर उत्तरेकडे थंडीचा प्रभाव अधिक आहे. विदर्भातही थंडीचा प्रभाव अधिक आहे.

भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ के. होसळीकर यांचे ट्विट-

काही ठिकाणीच थंडी का वाढणार?

दरम्यान, मराठवाड्यातल्या काही ठिकाणीच तापमानाचा पारा का घसरणार, असाही प्रश्न उपस्थित होतोय. तर उत्तरेकडील वाऱ्याचा जोर कमी होत आहे. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उत्तरेकडील वाऱ्यांचा परिणाम जाणवत असल्याने तेथे थंडी आहे. परंतु, पुढे दोन दिवसांत सर्वत्र किमान तापमानात संथ गतीने वाढ होणार आहे.

पिकांवर काय परिणाम ?

हिवाळा संपत आल्यामुळे हळू हळू तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे पिकांवर याचा फार परिणाम होणार नाही. मात्र काही ठिकाणी ज्वारीवर चिकटा किंवा खोड अळीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तसेच पिकांवर कीड आणि इतर रोड पडणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.

इतर बातम्या-

‘…अन्यथा तुमचा Lalu Prasad Yadav करु’, सरकार पाडण्यात मदत करा, Sanjay Raut यांना धमकी

Nashik Election | कळवण, देवळा, निफाडचे नगराध्यक्ष बिनविरोध; 3 ठिकाणी चुरशीची लढत

'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप.
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले.
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.