औरंगाबादेत आणखी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तीन दिवसांतील तिसरी घटना

औरंगाबाद शहरात पाण्यामध्ये बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीयेत. आज (20 जुलै) औरंगाबाद येथील हर्सूल तलावामध्ये बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत आणखी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, तीन दिवसांतील तिसरी घटना
पाझर तलावाचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 7:51 PM

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात पाण्यामध्ये बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आज (20 जुलै) औरंगाबाद येथील हर्सूल तलावामध्ये बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ शंकर पदमाने असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. वैद्यकीय औषधी विभागात काम करत असल्याचे ओळखपत्र मृत युवकाच्या खिशात आढळले आहे. (young man drowned in aurangabad harsul lake)

बुडालेला युवक औषधी विभागात नोकरीला

मिळालेल्या माहितीनुसार सौरभ शंकर पदमाने नावाचा एक तरुण शहरातील हर्सूल तलावाजवळ गेला होता. यावेळी तो पाण्यात बुडाला. ही घटना समजताच या परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शहरातील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या युवकाला तलावाच्या बाहेर काढले. वैद्यकीय औषधी विभागात काम करत असल्याचे ओळखपत्र मृत युवकाच्या खिशात आढळले आहेत. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी या युवकास मृत घोषित केले.

पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची तिसरी घटना

सध्या औरंगाबाद जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भरपूर पाऊस झाल्यामुळे तलाव, नद्या, ओढे, भरले आहेत. तसेच अनेक ठिकाणचे धबधबेसुद्धा वाहू लागले आहेत. याच कारणामुळे हिरवाई पाहण्यासाठी तसेच पर्यटनासाठी शहरातील अनेक तरुण फिरायला जात आहेत. यादरम्यान, पोहताना तेसच इतर कारणांमुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना औरंगाबादमध्ये मागील काही दिवसांपासून घडत आहेत.

औरंगाबादेत 18 जुलै रोजी दोघांचा मृत्यू

औरंगाबाद येथे 18 जुलै रोजी सातारा डोंगरात ट्रेकिंक करायला एकूण सात मित्र गेले होते. हे सातही जण डोंगर परिसरातील तलावात गेले होते. मात्र, यावेळी तलावात बुडून एकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेत इतर सहा जण सुदैवाने बचावले होते. लखन ईश्वर पवार वय-19 (रा.शिव शंकर कॉलोनी,औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. तर याच दिवशी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. आदिल शेख असे या मुलाचे नाव असून केंब्रिज जवळच्या डोहात ही घडना घडली होती. आदिल शेख हा सहा फूट खोल पाण्यात बुडाल्यानंतर मित्रांनी आरडाओरड केली होती. मात्र, मदतीस उशीर झाल्याने या मुलाने प्राण सोडला होता.

इतर बातम्या :

Video | औरंगाबादेत वेरुळजवळ रस्ता खचला, तब्बल 10 फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा, पूल कोसळण्याची भीती

Video : औरंगाबादमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग, आगीत कारखान्याचं मोठं नुकसान

7 दिवसांची मेहनत, 9 फुटांची रांगोळी, औरंगाबादच्या आसावरीने साकारला हुबेहूब विठ्ठल

(young man drowned in aurangabad harsul lake)

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.