Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कासव काढण्यासाठी विहिरीत उतरले ते दोघेही परतलेच नाही, नेमकं काय घडलं?

विहिरीत पाणी कमी होते. त्यामुळे त्यांनी कासव काढण्यासाठी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. पण, त्याठिकाणी त्यांनी अस्वस्थ वाटू लागले.

कासव काढण्यासाठी विहिरीत उतरले ते दोघेही परतलेच नाही, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 5:00 PM

भंडारा : पावसाचे दिवस आहेत. धो-धो पाऊस कोसळत आहे. जमिनीवरील प्राणी सक्रिय झाले आहेत. साप, विंचू, कासव, खेकडे असे प्राणी दिसत आहेत. साप पाहून बरेच लोकं घाबरतात. खेकडे हे जागोजागी छिद्र पाडताना दिसतात. काही ठिकाणी कासवासारखे दुर्मीळ प्राणी दिसतात. अशीच एक घटना लाखनी तालुक्यातील गडपेंढरीत घडली. दोन मित्र शेतावर गेले होते. त्यांना कासव दिसले. विहिरीत पाणी कमी होते. त्यामुळे त्यांनी कासव काढण्यासाठी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. पण, त्याठिकाणी त्यांनी अस्वस्थ वाटू लागले.

अशी आहेत मृतकांची नावं

कासव काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोघांचा विषारी वायूमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गडपेंढरी इथं आज सकाळी घडली. दयाराम भोंडे (वय 35 वर्षे) मंगेश गोंदळे (वय 25 वर्षे) असं दोघांचा मृत्यू झालेल्यांचं नाव आहे.

दोघांचा गुदमरून मृत्यू

विष्णू गायधने त्यांच्या शेतात भात पिकाची लागवड सुरू आहे. यासाठी लगतच्या भुगाव मेंढा येथील हे दोघं आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत शेतात आले होते. विहिरीत कमी पाणी असल्यानं त्यात दोघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तर अशा दुर्घटना टाळता येतील

शेताची काम सुरू आहेत. शेताला पाणी देण्यासाठी काही शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. नाल्याकाठावर शेती असणारे मोटारपंप किंवा इंजीन नाल्यावर लावतात. अशावेळी त्यांना नाल्यातही उतरावे लागते. अशा परिस्थितीत धोका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेततळे शेतात तयार करणे गरजेचे आहे. विहिरीत उतरण्याची किंवा नाल्यात खाली उतरण्याची गरज पडत नाही. शेततळे शेतात झाल्यास अशा दुर्घटना टाळता येतील.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.