भुसावळ येथे मध्य रेल्वेची मालगाडी घसरली, पालघर अपघाताची पुनरावृत्ती, पुन्हा आयर्नचे रोल विखुरले

भुसावळ विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पाहणी केली आहे. रेल्वे रुळांवरून मालगाडीचे डबे का घसरले? याची चौकशी केली जाणार आहे, अपघाताला जबाबदार घटकांना शोधून काढण्यात येणार आहेत.

भुसावळ येथे मध्य रेल्वेची मालगाडी घसरली, पालघर अपघाताची पुनरावृत्ती, पुन्हा आयर्नचे रोल विखुरले
Bhusaval JunctionImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 5:47 PM

मध्य रेल्वेच्या भुसावळ येथे मालगाडी घसरल्याची घटना घडली आहे. या घटनेने अलिकडे पश्चिम रेल्वेच्या पालघर यार्डात मालगाडी घसल्याच्या घटनेच्या स्मृती जागृत झाल्या आहेत. सकाळी घडलेल्या या अपघातात कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. यात रेल्वेच्या रुळांचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. 1 जानेवारी 2024 ते 16 जुलैपर्यंत ही पाचवी घसरगुड्डीची घटना असल्याचे म्हटले जात आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ यार्डात मालगाडीचे दोन डबे रेल्वे रुळावरून घसरल्याने मुंबई,नागपूर आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले जात आहे.

मुख्य यार्डातून मेन लाईनवरून यार्डात प्रवेश करताना मालगाडीच्या 58 डब्यांपैकी दोन डब्यांचे आठ चाकं ( ट्रॉली ) सकाळच्या सुमारास रेल्वे रुळावरून घसरली. ही घटना नवीन गुड्स शेडजवळ घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळाचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटना कळताच रेल्वेची एटीआर गाडी घटनास्थळावर दाखल झाली. आणि बचाव दलाने काम सुरु केले आहे. संबंधित विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मेन लाईन मोकळी केली.

अपघाताच्या कारणांचा तपास

अपघाग्रस्त मालगाडीचे दोन्ही डबे रेल्वे रुळावर पुन्हा चढविण्यात आले आणि त्या दोनडब्यांना जोडून पुढे नेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच परत मालगाडीचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने गडबड झाली. मालगाडीच्या दोन डब्यांना जोडून मालगाडी 58 डब्यांसह सहा ते सात तासामध्ये जोडण्यात यश आले.  अपघाताचे नेमके कारण काय याचा सविस्तर अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येणार आहे. ही घटना मुख्य यार्डात घडल्याने मुंबई, नागपूर आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पालघर घटनेची आठवण

अशाच प्रकारे 28 मे रोजी पश्चिम रेल्वेच्या हद्दीत पालघर यार्डात मालगाडीचे सहा डबे रुळांवरुन घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक अनेक तासांसाठी विस्कळीत झाली होती. या अपघातात देखील मालगाडी लोखंडी पत्र्याचे रोल वाहून नेत असताना अपघात घडला होतो.

Non Stop LIVE Update
फडणवीस बंगला विकून पैसे देत नाही तर..','लाडकी बहीण'वरून जरांगेंची टीका
फडणवीस बंगला विकून पैसे देत नाही तर..','लाडकी बहीण'वरून जरांगेंची टीका.
केसरकरांना चप्पलेनं मारल पाहिजे; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
केसरकरांना चप्पलेनं मारल पाहिजे; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपचं केंद्रीय नेतृत्व सरकारवर नाराज
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपचं केंद्रीय नेतृत्व सरकारवर नाराज.
'सातच्या आत घरातचा आग्रह फक्त मुलींसाठीच? हायकोर्टाचा थेट सवाल
'सातच्या आत घरातचा आग्रह फक्त मुलींसाठीच? हायकोर्टाचा थेट सवाल.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता, कारण मोटरमन...
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता, कारण मोटरमन....
पुतळ्याच्या घटनेवरून केसरकर काय बोलून गेले, 'वाईटातून चांगलं घडेल...'
पुतळ्याच्या घटनेवरून केसरकर काय बोलून गेले, 'वाईटातून चांगलं घडेल...'.
हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार? दादा महायुतीत अन् भाजपचे 19 नेते अडचणीत?
हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार? दादा महायुतीत अन् भाजपचे 19 नेते अडचणीत?.
शिवरायांचा पुतळा कोसळला अन् घमासान, केसकरांचं डोकं ठिकाणावर आहे का?
शिवरायांचा पुतळा कोसळला अन् घमासान, केसकरांचं डोकं ठिकाणावर आहे का?.
त्या नराधमांना चौकात..., चिमुकलींच्या अत्याचारावर पंकजा मुंडेंचा संताप
त्या नराधमांना चौकात..., चिमुकलींच्या अत्याचारावर पंकजा मुंडेंचा संताप.
ओह..10व्या थरावर सलामी अन् पत्त्यासारखे कोसळले, जय जवानचा विक्रम चुकला
ओह..10व्या थरावर सलामी अन् पत्त्यासारखे कोसळले, जय जवानचा विक्रम चुकला.