पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या सोईसुविधांसाठी दोन कोटींच्या निधीला मंजुरी; अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक

यंदा आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता आहे. पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या सोईसुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या सोईसुविधांसाठी दोन कोटींच्या निधीला मंजुरी; अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 7:39 AM

पंढरपूर : गेले दोन वर्ष देशासह राज्यात कोरोनाचे (Corona) संकट होते. कोरोनामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधांमधून पंढरपूरची आषाढी वारी (Ashadhi Wari) देखील सुटली नव्हती. कोरोनामुळे गेले दोन वर्ष वारकऱ्यांना आषाढी वारीला जाता आले नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने वारी निर्बंधमुक्त वातावरणात पार पडणार आहे. गेले दोन वर्ष वारीला जाता न आल्याने यंदा आषाढी वारीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून वारीचे नियोजन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने वारी मार्गावरील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी दोन कोटी 69 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी वारी मार्गावर सोई सुविधा उभारण्यात येणार आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली, या बैठकीमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पन्नास टक्के निधी जिल्हा परिषदेकडून

आषाढी वारीनिमित्त अनेक संताच्या पालख्या या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. या पालख्यांसोबत हजारो वारकरी देखील पंढरीत दाखल होतात. हे वारकरी साधारणपणे पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असतात. वारी काळात वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांना सोई सुविधा पुरवण्यात याव्यात यासाठी दोन कोटी 69 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पैकी पन्नास टक्के निधी ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहे. तर उर्वरीत पन्नास टक्के निधी हा ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होणार

गेले दोन वर्ष राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात अनेक निर्बंध घालण्यात आले. आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरला विठूरायाच्या दर्शनासाठी जात असतात. शेकडो वर्षांपासून ही पंरपार सुरू आहे. मात्र कोरोनामुळे त्यात खंड पडला. कोरोनामुळे दोन वर्ष वारकऱ्यांना पंढरपूरला जाता आले नाही. परंतु आता कोरोना निर्बंध उठवण्यात आले आहेत. यंदाची वारी निर्बंधमुक्त वातावरणात पार पडणार असल्याने, यंदा मोठ्या संख्येने वारकीर पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.