Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ज्यांना विधानसभेची जाणीव…,’ राज यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काय म्हणाले पटेल ?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे  पवार यांच्यावर प्रफुल पटेल यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झालो असले तरी शरद पवार साहेबाबद्दल माझ्या मनात आजही आदर कायम आहे आणि मी त्यांना आपला गुरु मानतो,त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही असेही पटेल यांनी सांगितले.

'ज्यांना विधानसभेची जाणीव...,' राज यांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले पटेल ?
raj thackeray and praful patel
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 3:42 PM

जरांगेंनी मागणी केलेल्या मराठा समाजाच्या सगे सोयऱ्याच्या आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे. परंतु त्याचबरोबर ओबीसी, इतर समाजांच्या आरक्षणावर त्याचा काय परिणाम होईल, याचा सुद्धा संपूर्ण अभ्यास सरकार करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासंबंधी महाराष्ट्र सरकार काम करीत आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी गोंदिया येथे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसंवाद यात्रा’ ही पुढच्या आठवड्यात गोंदिया जिल्ह्याच्या दौरा करणार असून गोंदिया जिल्ह्याच्यासह वाशिम , बुलढाणा ,यवतमाळ या शहरांमध्ये सुद्धा ही यात्रा जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळालेले आहे आणि शरद पवार गटाला तूतारी चिन्ह देण्यात आलेला आहे, परंतु याबाबत आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आली आहे आणि याबाबत सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल असेही पटेल यांनी यावेळी सांगितले. रोहित पवार यांनी पाच वर्षे जनतेची सेवा केली आणि पुढील पाच वर्षात ते महाराष्ट्राची सेवा करतील, त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात येईल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. त्याबद्दल विचारले असता खासदार प्रफुल पटेल म्हणाले की प्रत्येक नेते हे त्या क्षेत्रात जाऊन आपला नेता निवडून यावा यासाठी अशा प्रकारची वक्तव्यं करीत असतात, परंतु यांची सत्ता येईल तेव्हाच ते मंत्री करतील ना असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

निवडणुका या दिवाळीनंतर घ्याव्यात …

सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या दिवाळीनंतर घेण्यात याव्यात अशी विनंती केली आहे, त्यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की बरोबर आहे कारण महाराष्ट्रामध्ये लगेच आता नवरात्र,दिवाळी यासारखे मोठे सण आहेत आणि या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक हे व्यस्त असतात आणि त्यामुळेच निवडणुका ह्या दिवाळीनंतर घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज ठाकरे यांच्यावर टीका

राज ठाकरे यांनी लाडकी बहीण ही योजना राजकीय स्वार्थासाठी काढली असून या योजनेच्या बोज्यामुळे जानेवारी नंतर कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला देखील पैसे उरणार नाहीत अशी टीका मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केली आहे. त्यावर प्रफुल पटेल म्हणाले की ज्यांना विधानसभा आणि सरकारची जाणीव नाही, त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काय बोलावे अशी टीका प्रफुल पटेल यांनी केली आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.