Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon | अन् काही क्षण सर्वांनीच रोखला श्वास! जळगाव रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे गाड्यांमध्ये अडकले प्रवासी

Jalgaon | जळगाव रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला. दोन दिवसांपूर्वीच चालत्या रेल्वेतून उतरताना रेल्वेखाली ओढल्या गेलेल्या तरुणाला त्याचे दोन पाय गमवावे लागले. तर एका रेल्वेतून आउटर साईडने उतरल्यानंतर दुसऱ्या बाजूने रेल्वे आल्याने त्या कुटुंबाचा एकदमच गोंधळ उडाला. बघ्यांचा पण काळजाचा ठोका चुकला.

Jalgaon | अन् काही क्षण सर्वांनीच रोखला श्वास! जळगाव रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे गाड्यांमध्ये अडकले प्रवासी
अन् काळजाचा ठोका चुकला Image Credit source: फाईल फोटो
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 2:23 PM

किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,जळगाव | 6 March 2024 : रेल्वे स्थानकावर प्रवाशांना त्यांचा हलगर्जीपणा, अतिघाईचा फटका बसतो. दोन दिवसांपूर्वीच जळगाव रेल्वे स्थानकावर एका तरुणाला दोन पाय गमवावे लागले. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. तर तर एका रेल्वेतून आउटर साईडने उतरल्यानंतर दुसऱ्या बाजूने रेल्वे आल्याने त्या कुटुंबाचा एकदमच गोंधळ उडाला. हे कुटुंब दोन धावत्या रेल्वेंच्या मधात अडकले. यावेळी बघ्यांचा पण काळजाचा ठोका चुकला. पण नशीब बलवत्तर म्हणून त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

काय ओढावला प्रसंग

जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी थांबल्यानंतर आऊटर साईडने दोन लहान मुलांसह काही प्रवासी उतरले. रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर शॉर्टकट जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तेवढ्यातच दुसरी रेल्वे आली. एकदमच दुसरी रेल्वे आल्याने त्यांचा मोठा गोंधळ उडाला. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. दुसऱ्या बाजूने धावत्या रेल्वेच्या मधात हे प्रवासी अडकले. हे प्रवाशी जागेवरच खिळले. त्यामुळे त्यांच्यावर संकट ओढावले नाही. हे पाहून प्रवाशांनी गोंधळ केल्याने रेल्वे सुरक्षा दलाचे जवान धावून आले. त्यांनी मदतीऐवजी संताप व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

लहान मुलांना दुसऱ्या रेल्वेत चढवले

ही घटना अगदी काही क्षणातच घडली. पण मुलांना वाचविण्याच्या हेतूने आई-वडिलांनी मुलांना ज्या रेल्वेतून उतरले. त्यात पुन्हा चढवले आणि दोन महिला आणि इतर प्रवाशी तिथेच खाली बसले. या सर्व प्रकारामुळे मुले भांबवली. तर प्रवाशांनी आरडाओरड केली. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलातील जवान धावून आले. त्यांनी या प्रकाराबद्दल प्रवाशांवर आरडाओरड करत संताप व्यक्त केला.

तर घडली असती मोठी दुर्घटना

रेल्वेने रुळ क्रॉस करण्याचा प्रयत्न केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. याच दरम्यान रेल्वे स्थानकावरील वीज सुद्धा काही काळासाठी बंद झाल्यामुळे गोंधळ वाढला. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. दोन्ही गाड्या गेल्यानंतर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. तसेच त्यांचे साहित्य सुद्धा प्लॅटफॉर्मवर देण्यात आले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवासी शॉर्टकट वापरतात मात्र शॉर्टकट त्यांच्या जीवावर भेटू शकतो त्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून रेल्वे रूळ पार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.