जिंकूनही उद्धव ठाकरे रडीचा डाव का खेळताहेत?; भाजप नेत्याचा थेट सवाल

Girish Mahajan on Uddhav Thackeray : भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. तेव्हा बोलकाना महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. गिरीश महाजन काय म्हणाले? वाचा सविस्तर...

जिंकूनही उद्धव ठाकरे रडीचा डाव का खेळताहेत?; भाजप नेत्याचा थेट सवाल
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 6:25 PM

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आता तुम्ही विजयी झालेला आहात. मग आता तुम्ही उत्सव साजरे करा. आनंद साजरा करा. उलट रडत का बसताहेत? असा रडीचा डाव आता खेळू नका. हा शेवटी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे ते काय कारवाई करणार ते मला माहित नाही, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यानंतर आता बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. यावर बोलताना गिरीश महाजनांनी टोला लगावला आहे. जळगावात महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे.

निवडणूक काळाप पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहेय यावर असे आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. पराभव समोर दिसला की आधीच असे कारण शोधले जातात. मतपेटी ईव्हीएम हा तर त्यांचा विषय ठरलेला आहे. मात्र आता त्यांचा जागा जास्त आल्या म्हणून हा विषय आता सध्या बंद झाला आहे. मी सुद्धा तो व्हीडिओ बघितला आहे. मात्र पैसे हे मतदानासाठी दिले की इतर कुठल्या प्रक्रियेसाठी दिले हा तपासाचा भाग आहे. त्यांनी जर तक्रार दिली तर निवडणूक आयोग चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल, असं महाजन म्हणाले.

जयंत पाटलांना प्रत्युत्तर

जयंत पाटील आणि देश काही संबंध आहे का? जयंत पाटील यांनी राज्यात त्यांच्या पक्षाचे काम करावं. नरेंद्र मोदीजींवर भाजपचा आणि लोकांचा विश्वास आहे. 240 जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत.मग तुम्ही का देशाची चिंता करता आहात? तसं असतं तर लोकांनी आम्हाला मताधिक्य दिलं नसतं. एवढ्या जागा निवडून दिल्या नसत्या, असं गिरीश महाजन म्हणाले.

जरांगेंच्या विधानावर प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील काहीही म्हणाले तरी मला आता त्या विषयावर बोलायचं नाही. त्यांचं म्हणणं काहीही असलं तरी मला त्या विषयावर काहीही बोलायचे नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेच्या भूमिकेवर भाष्य केलंय.

स्मिताताई वाघ या पहिल्यांदा खासदार झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या संपर्कात राहा लोकांशी संपर्क तोडू नका. खासदार झाले म्हणून आता लोकांचा संपर्क तोडू नका, असा सल्ला मी त्यांना दिलेला आहे.स्मिता ताई यांनी जास्तीत जास्त वेळ हा मतदारसंघासाठी लोकांचे काम करण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी द्यावा हे मी त्यांना सांगितलंय, असंही गिरीश महाजन म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.