Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीनं टरबूज घातले मातीत; बाजारात कवडीमोल दर..

अवकाळीनंतर जे शेतात उरलेला शेतमाल आहे. त्याला आता बाजारभाव नाही. कवडीमोल दराने शेतमाल विकला जात असल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.

अवकाळीनं टरबूज घातले मातीत; बाजारात कवडीमोल दर..
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 3:06 PM

रावेर/जळगाव : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात याचा मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी आता आम्ही जगायचं कसं असा सवाल उपस्थित करत आहे. जळगाव जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. गहू, मका, ज्वारी, कलिंगड आणि टरबूज पीक पूर्णतः वाया गेले आहे.

अवकाळीनंतर जे शेतात उरलेला शेतमाल आहे. त्याला आता बाजारभाव नाही. कवडीमोल दराने शेतमाल विकला जात असल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.

जळगाव जिल्ह्यात टरबूजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा टरबूज उत्पादकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

त्यामुळे काढणीला आलेले टरबूज अवकाळी पावसाच्या माऱ्याने खराब झाले आहेत. मात्र शिल्लक राहिलेल्या टरबूजालाही बाजारभाव नसल्याने टरबूज शेतकऱ्यांनी आता आम्ही जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला आहे.

अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने टरबुजाचे मोठे नुकसान झाले आहे.

तर शेतात असणारी टरबूजही अक्षरशः खराब झाले आहेत. त्याचा उत्पन्नावर परिणाम होत असल्याने व्यापारी ही बाजारपेठेत कमी रुपयामध्ये खरेदी करत आहेत.

अवकाळी पावसामुळे टरबूज खराब झाल्याने टरबूजालाही योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतात असलेल्या टरबूजामुळेही आता शेतकऱ्यांना आर्थिक फायदा न होता त्याचा त्यांना तोटाच होऊ लागला आहे.

'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?.
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?.