Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते?, उद्धव ठाकरे यांचा सवाल

पुढचा टप्पा आपलाच आहे. ही आपली सुजलाम सुफलाम भूमी आहे. शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी जगुया.

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते?, उद्धव ठाकरे यांचा सवाल
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 6:52 PM

जळगाव : उद्धव ठाकरे यांनी सभेपूर्वी आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, कधी-कधी काही गोष्टी होत नाही. पुढचा टप्पा आपलाच आहे. ही आपली सुजलाम सुफलाम भूमी आहे. शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी जगुया. वैशालीताई यांनी फिल्म दाखवली. त्यांना साथ देणे गरजेचे आहे.

यासाठी संशोधन व्हावं

आर. ओ. तात्या पाटील यांची उणीव कायम भासत राहते. असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी हे आर. ओ. तात्या पाटील यांचे कुटु्ंब होतं. पिकेल ते विकेल यासाठी जगभर संशोधन व्हावं, त्याला हमखास भाव मिळाला पाहिजे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

शेतकरी त्यांचे कुटुंब होते

जगणार कुणासाठी स्वतःसाठी की इतरांसाठी. शेवटच्या क्षणापर्यंत निर्मल पीकचं काय होणार. हा त्यांचा ध्यास होता. संपूर्ण शेतकरी हे त्यांचे कुटुंब होते, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. त्यांच्या कुटुंबाचे काय होणार हे त्यांचे लक्ष होते. माझ्या कुटुंबापेक्षा शेतकरी हित हा आर. ओ तात्या पाटील यांचा ध्यास होता, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

हे सुद्धा वाचा

पुन्हा येणार असल्याचे आश्वासन

बुरशी ही उपयोग आहे शिवाय घातकही आहे. कोरोनातील बुरशी घातक होती. आता मला शेतकऱ्यांसाठी मला खूप काही करायचे आहे. त्यामुळे तुमची लॅब बघायला मी पुन्हा येणार आहे, असे उद्धव ठाकरे उद्योजकांशी बोलताना म्हणाले.

जे विकेल ते पिकवा

विकेल ते पिकेल. ही संकल्पना मी मांडली होती. पुढच्या वर्षी आपल्याला काय विकता येईल. ज्या वस्तूला भाव मिळेल अशा वस्तू पिकवल्या पाहिजे. खत कोणतं वापरायचं. विभाग कोणता आहे, याचा विचार केला पाहिजे, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

पुढचा काळ आपलाच आहे

शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली. पुढचा काळ आपला आहे. त्यावेळी शेतकरी सुजलाम सुफलाम कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.