सरसकट आरक्षण दिल्यास ओबीसी नेत्यांना पोटदुखी?, महाजनांनी काय सांगितलं जरांगेंच्या कानात?; गौप्यस्फोट काय?

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. सरसकट आरक्षण दिल्यास ओबीसी नेत्यांना पोटदुखी होत असल्याचं महाजन बोलल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे.

सरसकट आरक्षण दिल्यास ओबीसी नेत्यांना पोटदुखी?, महाजनांनी काय सांगितलं जरांगेंच्या कानात?; गौप्यस्फोट काय?
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 7:57 PM

राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वातावरण तापलेलं आहे. दोन्ही समाजामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचं नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. हे सगळे एका माळेचे मणी आहेत, फायदा असला की आम्हाला गोड बोलत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर भाजप नेते गिरीष महाजन यांनी चर्चा करताना काय सांगितलेलं याबाबत जरांगे यांनी गौप्यस्फोट केलाय.

गिरीष महाजन डाव टाकतो आणि नंतर कायद्यात बसत नाही असं सांगत. गिरीश महाजन धोका देतो हे मला आधीच माहीत होते. सरसकट आरक्षण दिल्यास ओबीसी नेत्यांचे खूप दुखतंय असं गिरीश महाजन मला बोलले होते. सरकारने फसवले तरी मराठ्यांच्या लेकरांसाठी पुन्हा मी माझ्या जीवाची बाजी लावायला तयार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाचा जीव आरक्षणात आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सरकारने ठरवले आहे मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, मग आता मराठा समाजानेही ठरवले आहे की यांचा जीव सत्तेत आहे तर मग यांना सत्ताच द्यायची नाही. सरकारने आरक्षण दिले नाही तर मला माझ्या समाजाला सत्तेत बसवल्याशिवाय पर्याय नाही आणि यांना पडल्याशिवाय पर्याय नसल्याचं जरांगे म्हणाले.

शरद पवार आणि सरकार काय करतायत कळत नाही. हे सगळे एका माळेचे मणी आहेत, फायदा असला की आम्हाला गोड बोलतात, सध्या विरोधी आणि सत्ताधारी यांनी काहीच सुचत नाही, यांचे नुकसान झाल्यावर यांना कळेल सगळं, माझा समाज यांना धडा शिकवणार आहे. दिल्लीत नाहीत आणखी कुठं नेतील काहीही बोलतात, राज्यात कुणबी मराठा एक आहे, सगळं सारख आहे त्यामुळे आरक्षण दिलं पाहिजे. सगे सोयरे जर टिकत नाही तर मग जज आमच्याकडे कशाला आले होते? मराठा समाजाची एक नोंद सापडली तर त्याच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र दिली पाहिजे, तुम्ही त्यावेळी हे का मान्य केलं? असा सवाल जरांगेंनी केला आहे.c

लूट, स्वारी अन् 'खंडणी', पाटलांच्या त्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार
लूट, स्वारी अन् 'खंडणी', पाटलांच्या त्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार.
अजित पवारांकडून जाहीर कबुली; माझी चूक मी मान्य करतो, पण...
अजित पवारांकडून जाहीर कबुली; माझी चूक मी मान्य करतो, पण....
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.